• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Can The Indian Government Shut Social Media Accounts

सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकते का? जाणून घ्या काय आहेत यासाठीचे कायदेशीर नियम

Indian government social media ban : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 10:22 PM
Can the Indian government shut social media accounts

भारत सरकारने पाकिस्तानी सेलिब्रिटीजची इन्स्ट्राग्राम अकाउंट केली बॅन; जाणून घ्या पण काय आहेत नक्की यासाठी नियम ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indian government social media ban : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने भारतामधील अनेक पाकिस्तानी कलाकारांची आणि सेलिब्रिटींची इंस्टाग्राम तसेच एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट्स बंद केली आहेत. याशिवाय, काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावरून एक मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे — सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकते का? आणि यामागे काय नियम आहेत?

सरकारकडे किती अधिकार आहेत?

सर्वप्रथम, हे स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे की भारत सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट मनमानीपणे बंद करू शकत नाही. कोणत्याही खात्यावर बंदी घालण्यासाठी ठोस कारण असणे अत्यावश्यक आहे आणि एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (Information Technology Act, 2000) आणि त्याअंतर्गत २०२१ मध्ये जारी करण्यात आलेले आयटी नियम (IT Rules 2021) ह्या कायद्यांद्वारे सरकारला हे अधिकार प्रदान केले आहेत. या कायद्यांनुसार, जर सरकारला एखाद्या खात्यामुळे देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व, सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्र संबंध किंवा एखाद्या समुदायामध्ये तणाव निर्माण होण्याचा धोका वाटत असेल, तर ते त्या खात्यावर कारवाई करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निर्देश देऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या

खाते बंद करण्यामागे कोणते निकष लागू होतात?

भारत सरकार किंवा त्याचे संबंधित मंत्रालय फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब यांसारख्या कंपन्यांना नोटीस पाठवून खात्यावर कारवाई करण्याची मागणी करू शकते. सरकारने काही विशिष्ट परिस्थितींमध्येच कारवाईचा निर्णय घेतला आहे:

1)  देशद्रोही किंवा दहशतवादी प्रचार करणाऱ्या पोस्ट्स.

2)  बनावट बातम्या (Fake News) आणि अफवांचे प्रसारण.

3)  सामाजिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट्स – जसे की एखाद्या धर्म, जाती किंवा समुदायावर टिका.

4)  अश्लील, हिंसक किंवा बेकायदेशीर कंटेंट.

5)  दंगली किंवा हिंसाचार भडकवणारा मजकूर.

या प्रकारच्या कोणत्याही कृतीमुळे जर देशात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असेल, तर सरकार त्या अकाउंटवर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी घालू शकते.

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया कशी पार पडते?

सरकार संमतीनुसार आणि कायदेशीर मार्गानेच अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया पार पाडते. हे टप्पे या प्रक्रियेत येतात:

1. तपासणी आणि पडताळणी – पोस्ट्स आणि खात्याच्या क्रियाकलापांची बारकाईने चौकशी.

2. नोटीस जारी करणे – संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला किंवा खात्याच्या मालकाला नोटीस दिली जाते.

3. स्पष्टीकरणाची मागणी – खातेदाराकडून स्पष्टीकरण मागवले जाते.

4. अंतिम निर्णय – स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास, सरकार त्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश देते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत युद्ध झाले तर मी इंग्लंडला… ‘, पाकिस्तानी खासदाराचे विधान VIRAL, PM मोदींवरही हास्यास्पद विधान

पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या अकाउंटवर बंदी का?

भारत सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या काही खात्यांवर भारतविरोधी मजकूर, दहशतवादाचे समर्थन आणि फेक न्यूज पसरवण्याचे आरोप होते. विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर या कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या. हे खाते भारतातील कायद्यानुसार बंद करण्यात आले आहेत आणि यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.

 कायदा आणि सार्वजनिक हितासाठीच कारवाई

सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट मनमानीपणे बंद करू शकत नाही. यासाठी ठोस कारणे, स्पष्ट पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे माध्यम असले, तरी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सशक्त आणि जबाबदार नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे अशा कारवाया फक्त राष्ट्रीय हिताच्या संरक्षणासाठीच केल्या जातात, असा स्पष्ट संदेश या घटनांमधून मिळतो.

Web Title: Can the indian government shut social media accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • india pakistan war
  • instagram account
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच
1

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
2

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘एक नंबर बिनडोक, फाल्तूपणा थांबवा’, समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार

‘एक नंबर बिनडोक, फाल्तूपणा थांबवा’, समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार

Jan 07, 2026 | 01:18 PM
अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण

अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण

Jan 07, 2026 | 01:15 PM
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Jan 07, 2026 | 01:15 PM
घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

Jan 07, 2026 | 01:14 PM
CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Jan 07, 2026 | 01:08 PM
Mumbai Crime:  45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

Jan 07, 2026 | 01:06 PM
BJP Alliance MIM And Congress:  MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा

BJP Alliance MIM And Congress: MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा

Jan 07, 2026 | 01:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.