• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Can The Indian Government Shut Social Media Accounts

सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकते का? जाणून घ्या काय आहेत यासाठीचे कायदेशीर नियम

Indian government social media ban : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 10:22 PM
Can the Indian government shut social media accounts

भारत सरकारने पाकिस्तानी सेलिब्रिटीजची इन्स्ट्राग्राम अकाउंट केली बॅन; जाणून घ्या पण काय आहेत नक्की यासाठी नियम ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indian government social media ban : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने भारतामधील अनेक पाकिस्तानी कलाकारांची आणि सेलिब्रिटींची इंस्टाग्राम तसेच एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट्स बंद केली आहेत. याशिवाय, काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावरून एक मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे — सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकते का? आणि यामागे काय नियम आहेत?

सरकारकडे किती अधिकार आहेत?

सर्वप्रथम, हे स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे की भारत सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट मनमानीपणे बंद करू शकत नाही. कोणत्याही खात्यावर बंदी घालण्यासाठी ठोस कारण असणे अत्यावश्यक आहे आणि एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (Information Technology Act, 2000) आणि त्याअंतर्गत २०२१ मध्ये जारी करण्यात आलेले आयटी नियम (IT Rules 2021) ह्या कायद्यांद्वारे सरकारला हे अधिकार प्रदान केले आहेत. या कायद्यांनुसार, जर सरकारला एखाद्या खात्यामुळे देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व, सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्र संबंध किंवा एखाद्या समुदायामध्ये तणाव निर्माण होण्याचा धोका वाटत असेल, तर ते त्या खात्यावर कारवाई करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निर्देश देऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या

खाते बंद करण्यामागे कोणते निकष लागू होतात?

भारत सरकार किंवा त्याचे संबंधित मंत्रालय फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब यांसारख्या कंपन्यांना नोटीस पाठवून खात्यावर कारवाई करण्याची मागणी करू शकते. सरकारने काही विशिष्ट परिस्थितींमध्येच कारवाईचा निर्णय घेतला आहे:

1)  देशद्रोही किंवा दहशतवादी प्रचार करणाऱ्या पोस्ट्स.

2)  बनावट बातम्या (Fake News) आणि अफवांचे प्रसारण.

3)  सामाजिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट्स – जसे की एखाद्या धर्म, जाती किंवा समुदायावर टिका.

4)  अश्लील, हिंसक किंवा बेकायदेशीर कंटेंट.

5)  दंगली किंवा हिंसाचार भडकवणारा मजकूर.

या प्रकारच्या कोणत्याही कृतीमुळे जर देशात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असेल, तर सरकार त्या अकाउंटवर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी घालू शकते.

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया कशी पार पडते?

सरकार संमतीनुसार आणि कायदेशीर मार्गानेच अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया पार पाडते. हे टप्पे या प्रक्रियेत येतात:

1. तपासणी आणि पडताळणी – पोस्ट्स आणि खात्याच्या क्रियाकलापांची बारकाईने चौकशी.

2. नोटीस जारी करणे – संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला किंवा खात्याच्या मालकाला नोटीस दिली जाते.

3. स्पष्टीकरणाची मागणी – खातेदाराकडून स्पष्टीकरण मागवले जाते.

4. अंतिम निर्णय – स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास, सरकार त्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश देते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत युद्ध झाले तर मी इंग्लंडला… ‘, पाकिस्तानी खासदाराचे विधान VIRAL, PM मोदींवरही हास्यास्पद विधान

पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या अकाउंटवर बंदी का?

भारत सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या काही खात्यांवर भारतविरोधी मजकूर, दहशतवादाचे समर्थन आणि फेक न्यूज पसरवण्याचे आरोप होते. विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर या कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या. हे खाते भारतातील कायद्यानुसार बंद करण्यात आले आहेत आणि यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.

 कायदा आणि सार्वजनिक हितासाठीच कारवाई

सरकार कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट मनमानीपणे बंद करू शकत नाही. यासाठी ठोस कारणे, स्पष्ट पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे माध्यम असले, तरी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सशक्त आणि जबाबदार नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे अशा कारवाया फक्त राष्ट्रीय हिताच्या संरक्षणासाठीच केल्या जातात, असा स्पष्ट संदेश या घटनांमधून मिळतो.

Web Title: Can the indian government shut social media accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • india pakistan war
  • instagram account
  • Pahalgam Terror Attack

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.