सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची (Abhisekh Sharma) कामगिरी सर्वाधिक चर्चेत होती.
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या या खेळीचे भारताचे माजी दिग्गज खेळाडू योगराज सिंग यांनी भरभरून कौतुक केले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम मोडीत काढण्यात आले आहेत.