विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज! (Photo Credit - X)
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची (Abhisekh Sharma) कामगिरी सर्वाधिक चर्चेत होती. आता, सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अभिषेकच्या कामगिरीवर असेल, कारण त्याला या मालिकेत विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अभिषेक शर्माने प्रभावी फॉर्म दाखवला आहे. त्याने २४ सामन्यांमधील २३ डावांमध्ये ३६.९१ च्या सरासरीने ८४९ धावा केल्या आहेत. अभिषेकला आता १०,०० आंतरराष्ट्रीय टी-२० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १५१ धावांची गरज आहे.






