सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 18 मधील एकता कॉलनी आणि परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले असून, ते आता आक्रमक झाले आहेत. शिवाय इथल्या वार्डमधील नगरसेवकांचाही याकडे कानाडोळा होत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. इथल्या सर्व नागरिकांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याशी संपर्क साधून या समस्येविषयी आवाज उठवला आहे. शिवाय सर्वच नागरी सुविधांचा या परिसरात बोजवारा उडाला असून गटारी वेळच्यावेळी साफ केल्या जात नाहीत, कचरा घंटा गाडी ही तीन-चार दिवसातून एकदाच या परिसरात फिरकते त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 18 मधील एकता कॉलनी आणि परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले असून, ते आता आक्रमक झाले आहेत. शिवाय इथल्या वार्डमधील नगरसेवकांचाही याकडे कानाडोळा होत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. इथल्या सर्व नागरिकांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याशी संपर्क साधून या समस्येविषयी आवाज उठवला आहे. शिवाय सर्वच नागरी सुविधांचा या परिसरात बोजवारा उडाला असून गटारी वेळच्यावेळी साफ केल्या जात नाहीत, कचरा घंटा गाडी ही तीन-चार दिवसातून एकदाच या परिसरात फिरकते त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.






