सलग चार दिवसांचा मुसळधार पाऊस आणि ईसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराने शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला वर्गीय पिके सडून गेली असून ऊस जमीनदोस्त झाला आहे. हातच्या फोडाप्रमाणे पिकवलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खचून गेले आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
सलग चार दिवसांचा मुसळधार पाऊस आणि ईसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराने शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला वर्गीय पिके सडून गेली असून ऊस जमीनदोस्त झाला आहे. हातच्या फोडाप्रमाणे पिकवलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खचून गेले आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.