भारतासोबत 'असे' करणार... युनूस सरकारमधील हिंसाचारावर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे मोठे विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. स्थिरता आणि विकासाला चालना देणारी राष्ट्रीय सहमतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रथमोला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सद्यस्थिती आणि शेजारी देशांशी असलेले संबंध यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी मोहम्मद युनूसच्या अंतरिम प्रशासनातील पोलिसांच्या अपयशावर चिंता व्यक्त केली आणि देशातील शांतता, सुशासन आणि विकासासाठी राजकीय पक्षांच्या सक्रिय भूमिकेवर भर दिला.
जनरल वकार म्हणाले की, बांगलादेशची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासासाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. ते म्हणाले, “शांतता आणि स्थैर्याशिवाय विकास आणि सुशासन शक्य नाही. आपल्याला परस्पर सहिष्णुता वाढवावी लागेल आणि सलोख्याच्या दिशेने पावले टाकून राष्ट्रीय सहमतीचे वातावरण निर्माण करावे लागेल.” भारतासोबतच्या संबंधांवर वक्तव्य करताना ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील परस्परावलंबन महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की भारत आणि बांगलादेश या दोघांनाही त्यांच्या सुरक्षा, आर्थिक क्रियाकलाप आणि इतर गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल. संबंध चांगले राहणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.
ते म्हणाले की, आम्ही आमच्या कोणत्याही शेजारी देशासोबत त्यांच्या सामरिक हिताच्या विरोधात असे काहीही करणार नाही.
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी
बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यांनी भारताला रिमांडर पाठवले होते. आता पुन्हा एकदा बांगलादेशाने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन भारताबाबत आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी शेख हसीनांच्या प्रत्यर्पण आणि भारत, अमेरिका, तसेच चीनसोबत मजबूत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणे हे अंतरिम सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेने चुकूनही भारताविरोधात उचलले ‘हे’ पाऊल तर होईल मोठे नुकसान; ‘ट्रेड, टॅरिफ आणि ट्रम्प’ (RIS) चा इशारा
लष्कराची भूमिका मर्यादित करण्याबाबत चर्चा
देशातील निष्क्रिय पोलिस प्रशासनादरम्यान लष्कराची भूमिका वाढण्याची शक्यता जनरल वकार यांनी फेटाळून लावली. त्यांनी बांगलादेशातील मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि संस्था पुनर्संचयित करण्यासाठी राजकीयदृष्ट्या सक्षम सरकारच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, आम्हाला राजकीय पक्ष आणि सरकार हवे आहे. राजकारण आणि राजकीय सरकारशिवाय देशात संस्थात्मक पुनर्स्थापना शक्य नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणजे कल्पनांच्या आकाशात भविष्याचा शोध
म्यानमार सीमेवरील सुरक्षा चिंतेचा उल्लेख
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धावर बोलताना जनरल वकार यांनी कबूल केले की बांगलादेश-म्यानमार सीमेवर सुरक्षेची चिंता आहे. शेजारी देशांशी संतुलित आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.