Pakistan News : कंगाल पाकिस्ताननं पुन्हा ज्ञान पाजळलं! इस्रायल आणि भारतावर केले बिनबुडाचे आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणमधील युद्धबंदीनंतर पाकिस्तानी संसदेत बोलताना आसिफ ख्वाज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भारत आणि इस्रायलविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुस्लिम देशांनी आपल्या शत्रूंना ओळखले पाहिजे. दक्षिण आशियामध्ये भारत आणि अरब देशांमध्ये इस्रायल (Israel) मुस्लिम जगताचे सर्वात मोठे शत्रू आहे. यांच्या धोक्यापासून सावध राहण्याचे सांगत ख्वाज यांनी या देशांविरोधात एकत्र येण्याचे मुस्लिम देशांना आवाहन केले आहे.
याच वेळी गेल्या महिन्याभरापासून अमेरिका (America) आणि इराणमध्ये भीषण संघर्ष सुरु होता. ०८ एप्रिल रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे, दोन्ही देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे शस्त्रसंधी लागू झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. परंतु शांततेच्या प्रयत्नांतही ख्वाजा यांनी भडकवणारे विधान केले आहे. भारत आणि इस्रायलला मुस्लिमांसाठी धोका म्हणून संबोधले आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, ख्वाजा यांचे विधान पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारण आणि समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. गेल्या काही काळात पाकिस्तानने सतत अशा प्रकारच्या चिथावणीखोर विधाने केली आहे. याचा दक्षिण आशियातील परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
सध्या पाकिस्तानचे जगभरातून कौतुक होत असले, तरी दुसऱ्या बाजूला भडकवण्याची भाषणा करणारी विधाने स्पष्ट करतात की पाकिस्तान कधीच शांततेचा दूत बनू शकत नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चांणा उधाण आले आहे.
Ans: पाकिस्तानने इस्रायल आणि भारत मुस्लिमांचे शत्रू असल्याचा आरोप केला आहे.
Ans: पाकिस्तानच्या मते, भारत आणि इस्रायल मुस्लिम देशांचे शत्रू असून सर्व देशांनी धोका ओळखून या देशांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.






