फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बार्टोस्जेव्स्की यांनी सांगितले कि पोलंडची ईच्छा आहे भारताने सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य व्हावं . पुढे त्यांनी असेही सांगितले कि समिती मध्ये बदल करणं एवढं सोप्पं नाही . यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समितीमध्ये आधीच सदस्य असलेल्या देशांची सहमती घेणं . तरीही स्थायी सदस्याकडे विटोचा अधिकार आहे पण तरीही कोणत्याही एका देशाने बदल करण्यास विरोध केल्यास , बदल करण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही .
भारत आणि पोलंड यांमध्ये सुरक्षेसाठी मदत करण्यावर चर्चा झाली . तसेच दोन्ही देश गोपनीय आणि संवेदनशील माहितीच्या देवाणघेवाणी वर काम करत आहेत . यामुळे सुरक्षा संबंधित करार करण्यास आणखी सोप्प जाईल . दोघांच्या मध्ये तंत्रज्ञान याची ही देवाणघेवाण , ड्रोन , सॅटेलाईट , आधुनिक रक्षा सिस्टम यांचे उत्पादन करणं देखील समाविष्ट आहे .






