
Chabahar Port Project Fund
Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषण, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले आहे. इराणवरील या आर्थिक निर्बंधामुळे आणि ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळेच भारताने माघार घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी भारताचे महत्व लक्षात घेता या निर्बंधासाठी सहा महिन्यांची दिलेली मुदत आला संपत चालली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यता आहे.
ट्रम्प प्रशासानाने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफची (Tariff) घोषणा केली होती. परंतु 26 एप्रिल 2026 पर्यंत व्यापार तोडण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत आता संपत चालली असल्याने सध्या भारताने या प्रकल्पासाठीचा निधी शून्य केला आहे.
चाबहार प्रकल्प हा भारताला पाकिस्तान सोडून इराण (Iran), अझरबैजान, अफगाणिस्तान, मध्य आशिया, युरोप आणि रशियाशी कनेक्टिव्हीटी प्रदान करतो. या देशांशी भारताला इराणच्या या चाबहार प्रकल्पामुळे थेट या देशांशी व्यापार करता आला असता. शिवाया यामुळे भारताचे मध्य आशियातील महत्न अधिक वाढले असते. भारत आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) प्रकल्पा एक प्रमुख भागीदार असून भारतासाठी या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्व अधिक आहे.
चाबहार प्रकल्प थांबल्याने भारताच्या मध्य आशियातील प्रभाव कमी होईल. तसेच रशिया, युरोपी देशांशी व्यापारासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागले, यामुळे केनक्टिव्हीटवर परिणाम होईल. भारताने या प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेतलेली नाही, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही काळासाठी ताण येईल, परंतु याचा दीर्घकालीन प्रभाव होणार नाही.
Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट
Ans: अमेरिकेने इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच ट्रम्प प्रशासानाच्या कठोर भूमिकेमुळे भारतावर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चाबहार प्रकल्पासाठीचा निधी शून्य ठेवला आहे.
Ans: चाबहार बंदर हे इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ कॉरिडॉरसाठी महत्वाचे केंद्र आहे. यामुळे भारताला पाकिस्तानसोडून मध्य आशिया देशांशी, अफगाणिस्तानशी, रशिया आणि युरोपशी थेट व्यापार करता येतो.
Ans: चाबहार प्रकल्प थांबल्याने भारताच्या मध्य आशियातील प्रभाव कमी होईल. तसेच रशिया, युरोपी देशांशी व्यापारासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागले, यामुळे केनक्टिव्हीटवर परिणाम होईल.
Ans: भारताने या प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेतलेली नाही, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही काळासाठीच ताण येईल. याचा दीर्घकालीन प्रभाव होणार नाही.