IndianArmy: बांगलादेशातील अशांततेनंतर भारतीय लष्कर सतर्क; ड्रोन आणि S-400 ने सीमांवर नजर, कमांडर सक्रिय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Indian Army S-400 deployment Bangladesh border : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) हिंसक निदर्शने आणि शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारचे पतन झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर अराजकता माजली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतविरोधी शक्ती किंवा दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती गांभीर्याने घेत भारतीय लष्कराने बांगलादेशला लागून असलेल्या ईशान्येकडील सीमांवर आपली पकड मजबूत केली आहे. आता सीमेवर केवळ जवानच नाही, तर जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक ड्रोन डोळ्यात तेल घालून नजर ठेवत आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी नुकताच एक खळबळजनक इशारा दिला आहे. बांगलादेशातील अस्थिरतेचा फायदा घेत तिथल्या अनेक तुरुंगांतून धोकादायक दहशतवादी आणि अट्टल गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. हे गुन्हेगार भारतात घुसखोरी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्रिपुरा, मेघालय, मिझोरम आणि आसाम या राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत, त्यामुळे या राज्यांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ या प्रत्येक घडामोडीवर क्षणोक्षणी लक्ष ठेवून आहे.
भारताची ईशान्येकडील चार राज्ये मिळून बांगलादेशशी एकूण १,८८० किलोमीटरची सीमा सामायिक करतात. यामध्ये त्रिपुराची ८५६ किमी लांबीची सीमा सर्वात संवेदनशील आहे, कारण हे राज्य तीन बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे. याशिवाय मेघालय (४४३ किमी), मिझोरम (३१८ किमी) आणि आसाम (२६३ किमी) अशी लांबलचक सीमा आहे. अनेक ठिकाणी ही सीमा जंगलातून किंवा नद्यांतून जाते, जिथे पहारा देणे कठीण असते. मात्र, लष्कर आणि बीएसएफ (BSF) यांनी संयुक्तपणे या भागात ‘मल्टी-लेयर’ सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Alina Kabaeva : Putin प्रेमात पडले! ‘Girlfriend कोण?’ विचारताच रशियन राष्ट्राध्यक्ष चक्क लाजले; पाहा ‘तो’ VIRAL VIDEO
सीमेवर मानवी निगराणीसोबतच तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे. दुर्गम भागात लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास ड्रोनचा वापर केला जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारताने सीमावर्ती भागात S-400 मोबाइल लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केल्याचे संकेत दिले आहेत. ही यंत्रणा कोणत्याही हवाई धोक्याला किंवा शत्रूच्या हालचालीला काही सेकंदात नष्ट करण्यास सक्षम आहे. लष्कराच्या पूर्व कमांडच्या प्रमुखांनी नुकताच मिझोरममधील ‘परवा’ आणि त्रिपुरातील ‘बेलोनिया’ भागाचा दौरा केला, जिथे त्यांनी सैनिकांच्या तयारीचे कौतुक केले.
Army Commander of Eastern Command GOC spear corp IGAR East BSF officials All in the frame. Visuals from India- Bangladesh border. Indian armed forces are ready to crush Pakistanis and Kanglus. pic.twitter.com/Zyl3Mxejux — Akshit Singh 🇮🇳 (@IndianSinghh) December 19, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
भारतीय लष्कराचा संदेश स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत सीमेवर तडजोड केली जाणार नाही. सीमेपलीकडून होणारी तस्करी, गुन्हेगारी आणि मानवी घुसखोरी रोखण्यासाठी जवानांना ‘शूट ऑन साईट’ सारखे कडक आदेश लागू शकतात, अशी स्थिती आहे. लष्करी कमांडरच्या या भेटीचा मुख्य उद्देश हाच होता की, सीमेवर कोणतीही अनुचित घटना घडल्यास जवानांनी क्षणभराचाही विलंब न लावता प्रत्युत्तर द्यावे. बांगलादेशातील अंतर्गत परिस्थिती काहीही असली तरी, भारत आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. लष्कराची ही सतर्कता आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनात पाहता, शत्रूसाठी भारतीय सीमा ओलांडणे आता अशक्यप्राय झाले आहे.
Ans: बांगलादेशातील अशांततेमुळे सीमेवर घुसखोरी आणि तस्करीचा धोका वाढला आहे, परिणामी भारतीय लष्कर आणि बीएसएफने १८८० किमी लांब सीमेवर कडक सुरक्षा तैनात केली आहे.
Ans: सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कर ड्रोन (Drones) आणि S-400 ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली वापरत आहे.
Ans: बांगलादेशातील तुरुंगातून पळालेले दहशतवादी प्रामुख्याने त्रिपुरा, मिझोरम आणि आसाम यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करू शकतात.






