सध्या अनेक भागात तापमान 50 अंश सेल्सियसच्या पुढे पोहचले आहे. दिल्ली, नागपूरमध्ये उन्हाच्या झळांनी लोकं त्रस्त झाले आहेत. तर उन्हामुळे अनेक भागात पाणीटंचाई वाढली आहे. गाड्या धुण्याचे विसरून जा, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वानवा झाली आहे. पाण्याचे टँकर मागवून पाणी प्यावे लागत आहे.
अशा भागात जिथे पाण्याची समस्या आहे, तिथे लोकांना गाड्या साफ करताना खूप त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा पाण्याअभावी लोक महिना महिना गाड्या धुत नाहीत आणि त्यावर धूळ साचून राहते. तर गाडी धुण्यासाठी मेकॅनिककडे जाणे आणि कार ड्राय क्लीन करून घेणे हे पैशाकडून खूप महाग आहे. एवढा खर्च सतत करणे अनेकांना परवडत नाही.
अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला कार स्वच्छ करण्याचे ते सोपे उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही फक्त अर्धी बादली पाण्याने तुमची कार चमकवू शकता. कार वॉशिंगच्या या प्रक्रियेत, आपण पैसे तसेच वेळेची बचतही करू शकतो. चला कार साफ करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया…(फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”कार-बाईक्स दुसऱ्यांना देण्याआधी जाणून घ्या नियम https://www.navarashtra.com/automobile/who-will-be-responsible-if-there-is-an-accident-539327.html”]
कशी कराल कार स्वच्छ?
तुमची कार अर्ध्या बादली पाण्यात स्वच्छ होईल. पण अधिक चांगली चमकण्यासाठी पॉलिश वापरणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला फक्त 10 रुपये खर्च करावे लागतील. कार पॉलिश महिन्यातून एकदा वापरणे आवश्यक आहे. कार साफ केल्यानंतर त्यावर पॉलिश लावून चांगले घासून घ्या. यामुळे कार पेंटचे आयुष्य वाढेल. यासाठी डॅशबोर्ड पॉलिशही बाजारात उपलब्ध आहे. या पॉलिशची किंमत 100 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहे. एकदा याचा लावल्यास दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही. हे पॉलिश घेऊन ठेवावे आणि महिन्यातून एकदा वापरावे.
दुर्गंधीपासून सुटका

अनेकदा गाडीच्या केबिनमध्ये दुर्गंधी येते. कारमध्ये खाद्यपदार्थ पडल्यामुळे हे घडते. हे टाळण्यासाठी कारमध्ये परफ्यूम वापरा. गाडीत काही खाल्लं किंवा प्यायलं तर लवकरात लवकर साफ करा. असे केल्याने त्या वस्तू कुजण्यापूर्वी स्वच्छ होतील आणि गाडीला दुर्गंधी येणार नाही. त्याची नियमित काळजी घ्या आणि कारची स्वच्छता राखा.






