(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जिल्ह्याला जमीन महसूलचे २२७ कोटी ७५ लाख ६८ हजाराचे उदिष्टे देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे तहसिलदार आबासाहेब तांबे यांनी मंडळा अधिकारी व तलाठी यांच्या सहकार्यातून चालू वर्षात १५१ कोटी १९ लाखाची वसुली केली असून, मागील वर्षाच्या १४५.६७ कोटींच्या तुलनेत यंदा ५.५२ कोटींची वाढ झाली आहे. यामुळे जमीन महसूलात स्थिर आणि सकारात्मक वाढ कायम असल्याचे चित्र आहे. तर गौण खनिज महसूलीचे या वर्षी २५० कोटीचे उदीष्ट होते. त्यात १८५.९६ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी १७०.९५ कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत १५.०१ कोटींची वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात पालिका महापालिका निवडणुकांचे कामांमुळे बराच वेळा वसुली करता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीचा आकडा फुगलेला दिसत होता. मात्र योग्य नियोजनामुळे महसुल यंत्रणा कामाला मार्चपर्यंत लागली. ३०जमिन महसुलीची केवळ १२२ कोटी २८ लाखाची वसुली झाली होती. ३१ मार्च शेवटचा दिवस होता. या दिवशी स्वतः जिल्हाधिकारींसह महसूल यंत्रणा रात्री उशिरापर्यंत वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेवटचा एका दिवसात २८ कोटी ९० लाख २२ हजार रुपयाची विक्रमी जमिन महसुल ची वसुली झाली.
३१ मार्चला महसुल विभागाचे तहसिलदार आबासाहेब तांबे यांच्या आजोबांचे निधन झाले. अशा परिस्थिती त्यांनी प्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले. ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत त्यांनी वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गावी गेले. त्यांनी आधी कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
जमिन महसुल (कोटी)
उदिष्ट : २२७७५.६८
वसुली : १५११८.९३
टक्केवारी : ६६.३८
गौण खनिज (कोटी)
उदिष्ट : २५०००,००
वसुली : १८५९५.७२
टक्केवारी ७४.३८
जमिन व गौण उदिष्टे : ४७७७५.६८
एकूण वसुली टक्केवारी ७०.५७
३३७१४.४१ एकूण वसुली






