संग्रहित फोटो
आतापर्यंत परीक्षेत 109 गैरप्रकाराची नोंद झाली आहे. पुणे विभागीय मंडळाच्या अखत्यारीत 34 कॉपी प्रकरणे आढळली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील पाच आणि अमरावती विभागीय मंडळातील एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी झाल्याचे समोर आले आहे. राज्यात दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे. यंदा बारावीची परीक्षा राज्यातील 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी सुमारे 95 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत.
सीसीटीव्ही सुविधा नसलेल्या 172 केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. मात्र, कठोर उपाययोजना करूनही कॉपी प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सीसीटीव्हीमुळेच सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाकडून अधिक दक्षता घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण
विभागीय मंडळातील कॉपी प्रकरणे
अमरावती- 52
पुणे-34
नागपूर-22
मुंबई -10
लातूर-27
छत्रपती संभाजीनगर-32
नाशिक -5
कोकण-०
कोल्हापूर-०
एकूण- 109






