पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात (फोटो- Istockphoto
पूर्वांचल एक्सप्रेसवर भीषण अपघात
५ ठार तर 16 प्रवासी गंभीर जखमी
चालकाला झोप आल्याने सुटले वाहनाचे नियंत्रण
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजधानी लखनौमध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस लुधीयानावरुन दरभांगाला जात होती. गाडी चालवताना ड्रायव्हरला झोप आल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि बसचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बस 80 किमी प्रतीतास या वेगाने धावत होती. नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात
नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांवर काळाने भीषण झडप घातली आहे. पोखराहून राजधानी काठमांडूकडे निघालेली एक प्रवासी बस धाडिंग जिल्ह्यातील पृथ्वी महामार्गावर नियंत्रणाबाहेर जाऊन त्रिशुली नदीच्या पात्रात कोसळली. या हृदयद्रावक अपघातात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश असून, या घटनेने संपूर्ण नेपाळसह आंतरराष्ट्रीय स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी
हा भीषण अपघात धाडिंग जिल्ह्यातील बेनीघाट रोरांग येथे पहाटे १ वाजताच्या सुमारास घडला. डोंगराळ रस्ता आणि अंधार असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यापासून सुमारे ३०० फूट खाली थेट त्रिशुली नदीत जाऊन कोसळली. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. ज्यावेळी बस नदीत पडली, तेव्हा सर्व प्रवासी झोपेत होते, त्यामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने बस काही अंतरापर्यंत वाहत गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ लष्कराच्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीची वेळ आणि दुर्गम भाग असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते.






