काय घडलं नेमकं ?
आत्महत्या करणाऱ्या तरुणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. गेल्या काही महियांपासून गावातील एका तरुणांकडून तिचा पाठलाग केला जात होता. तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिचे शिक्षण केज येथील दुसऱ्या शाळेत सुरू करण्यात आले होते. तसेच तिच्या राहण्याची सोयही बदलण्यात आली होती. तरीदेखील संबंधित तरुणाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारासही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अधिकच तणावाखाली गेली होती.
भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं
ठोस कारवाई करण्याची मागणी
पीडित मुलीने घरात असतांना गळफास घेत आपले जीवन संपवले. रात्री उशिरा कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अक्षय भगवान काळे (वय 27) याच्याविरुधात तक्रारही केली होती. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.
Ans: सततच्या छेडछाड आणि पाठलागामुळे मानसिक तणाव वाढल्याने.
Ans: गावातील ट्रॅक्टर चालक अक्षय भगवान काळे याच्यावर आरोप आहे.
Ans: वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






