काय घडलं नेमकं?
भाग्यश्री बापू कांबळे (रा. डिसकळ, ता. कळंब, जि. धाराशीव) हीच लग्न पाच वर्षांपूर्वी चनई येथील रहिवासी असलेल्या अजय तुकाराम चौरे याच्याशी झाले होते.
लग्नानंतर सुरवातीला सर्व काही व्यवस्थित होत मात्र काही काळानंतर, पतीला अजयला दारूचं व्यसन जडलं. दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला सतत मारहाण करायचा. एवढंच नाही तर, पीडितेची सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे नेहमी आपल्या सुनेला “घरकाम येत नाही” आणि “तू संसार करू शकत नाहीस”
असे टोमणे मारू लागले आणि तिचा मानसिक छळ करू लागले.
मारून टाकण्याची धमकी
जेव्हा मुलगी आम्रपाली आजारी होती त्यामुळे तिच्या उपचारासाठी भाग्यश्रीच्या वडिलांकडे ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण गरिबीमुळे बापू कांबळे यांनी 2 ते 3 हजार रुपये पाठवले. मात्र एवढेच पैसे का पाठवले, पूर्ण का पाठवले नाही? असे म्हणत भाग्यश्रीच्या पती अजयने तिला मारून टाकण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
छळाला कंटाळून संपवले आयुष्य
या सततच्या छळाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी तिने टोकाचा पाऊल उचलले. सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास तिच्या राहत्या घरासमोरील सीताफळच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एकच टाहो फोडला.
गुन्हा दाखल
माहेरच्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये भाग्यश्रीचा पती अजय चौरे, सासू अयोध्या चौरे आणि सासरे तुकाराम चौरे यांना जबादार धरले आहे. त्यांनी या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108, 115 (2), 3(5), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार राजेंद्र पवार करत असल्याची माहिती आहे.
Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर
Ans: विवाहितेने कथित छळाला कंटाळून गळफास घेतल्याची माहिती.
Ans: पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध.
Ans: भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद.






