• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Crime Of Andekar Gaikwad Gangs Has Increased In Pune

आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील ‘तो’ नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने नियम मोडला आहे. हा नियमभंग आता आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2025 | 11:48 AM
आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील 'तो' नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे/अक्षय फाटक : गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून ‘गुन्हेगारीतला नो-फॅमिली रूल’ बाद ठरवला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न तसा सर्वश्रुत आहे. राज्यभरात कोयता व गोळीबाराने खून करणे हा पुण्यातील गुन्हेगारीचा नवा पॅटर्न. या पॅटर्नमुळे खुनानंतर दहशतीचे सावट व निशाणी पाठिमागे ठेवली जाते. पुण्यातील गुन्हेगारी तशी लाठ्या-काठ्यांपर्यंतच मर्यादित होती. आता ती गोळीबार व कोयत्यापर्यंत गेली. पुण्याच्या गुन्हेगारीत सुरूवातीपासून आंदेकर टोळीचा सहभाग आहे. पहिली टोळी म्हणूनही या टोळीला ओळखतात. आंदेकर व माळदकर टोळीच्या संघर्षाचे आज देखील किस्से सांगितले जातात. तेव्हापासून गुन्हेगारी जगतातील वर्चस्व आंदेकर टोळीने राखल्याचे बोलले जाते. परंतु, आता गुन्हेगारीतल्या नियमभंगाची सुरूवातही याच टोळीपासून झाली म्हणावी लागेल.

गायकवाड-आंदेकर टोळीचा संघर्ष नजिकच्या काळातलाच. त्याला फार मोठा काही इतिहास नाही. आर्थिक सुबत्तेतून सोमनाथ गायकवाड-आंदेकरांत वाद-विवाद झाले. सोमनाथने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आंदेकर टोळीशी वाद घेतला. सोमनाथ आंबेगाव पठारचा. पण आंदेकर टोळीला बऱ्यापैकी ओळखणारा. गुन्हेगारीतला ‘सुरज’ टिकण्यासाठी त्याने संवगडीसोबत घेऊन टोळी निर्माण केली. आता या दोन टोळ्यांमध्ये टोकाचे वैमन्यास्य सुरू झाले आहे.

पुर्वइतिहास..!

आंदेकर-गायकवाड टोळीत टोकाचे युद्ध पेटले ते २०२३ पासून. ऑक्टोंबर २०२३ मध्ये निखील आखाडे व अनिकेत दुधभातेवर आंदेकर टोळीकडून हल्ला झाला. त्यात निखील आखाडेचा मृत्यू झाला. तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेईल, असा अंदाज होता. त्यानूसार, १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री वनराज याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केला. आंदेकर टोळीच्या वर्मी हा घाव घातल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वासह पोलिस दलात होती. त्याचा बदला घेतला जाईल असेही भाकित होते. त्यातूनच मग, ५ सप्टेंबर २०२५ रोजी वनराज याच्या खूनातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, गुन्हेगारीतील दोन्ही खून नियमांच्या उलटे असल्याची चर्चा आता सुरू आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार वनराज याचा गुन्हेगारीशी संबंध नव्हता. तरीही त्याचा जीव घेतला. आयुष याचाही गुन्हेगारीशी संबंध नसताना त्याला टार्गेट करून ठार मारले गेले.

नात्यातील दोघांचा बळी

आंदेकर- गायकवाड टोळीत अत्यंत जवळच्या नात्यातील दोघांचा जीव घेतला गेला. बंडू आंदेकर यांना संजीवनी, कल्याणी व वृदांवनी या तीन मुली. पहिली संजीवनी हिचा जयंत कोमकर व दुसरी कल्याणी हिचा गणेश कोमकर याच्याशी विवाह झाला. आयुष हा गणेशचा मोठा मुलगा. म्हणजे, बंडू आंदेकरचा सख्खा नातूच आणि वनराज याचा भाच्चा देखील. पण, भावाच्याच खूनात सहभाग असल्याच्या आरोपावरून बंडू आंदेकर याच्या तक्रारीवरून संजीवनी, तिचा पती, व दिर गणेश यांना अटक झाली. बहिणीने भावाला मारण्यासाठी कट रचल्याने त्याला आर्थिक देखील किनार असल्याचे बोलले जाते. या सर्वात मात्र, बंडू आंदेकरला पहिला मुलगा आणि आता नातवाला गमवावे लागले आहे.

Web Title: Crime of andekar gaikwad gangs has increased in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Murder Case
  • pune murder
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या
1

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

धक्कादायक ! बहिणीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या
2

धक्कादायक ! बहिणीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

Mangesh Kalokhe Murder Case: मंगेश काळोखे प्रकरणात अनेक ‘लूप होल’! आमदार महेंद्र थोरवे यांचा संशय; सर्व शंकांच्या चौकशीची मागणी
3

Mangesh Kalokhe Murder Case: मंगेश काळोखे प्रकरणात अनेक ‘लूप होल’! आमदार महेंद्र थोरवे यांचा संशय; सर्व शंकांच्या चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Feb 03, 2026 | 03:15 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

Feb 03, 2026 | 03:07 PM
संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

Feb 03, 2026 | 03:04 PM
Nagpur Crime: पेंचमधील वाघाची शिकार अंगलट; ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास

Nagpur Crime: पेंचमधील वाघाची शिकार अंगलट; ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास

Feb 03, 2026 | 03:04 PM
जानेवारीत वाहन विक्रीत वाढ! ऑटोमोबाईल क्षेत्राची मोठी झेप, यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उत्तम कामगिरी

जानेवारीत वाहन विक्रीत वाढ! ऑटोमोबाईल क्षेत्राची मोठी झेप, यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उत्तम कामगिरी

Feb 03, 2026 | 03:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.