काय घडलं नेमकं?
अविनाश अंकुश वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. हृषीकेश पवार हा तरुण २२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘मार्केटला जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता, मात्र तो परतला नाही. याप्रकरणी हृषीकेशच्या आईने तालुका जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. कदिम जालना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी अविनाश वाघमारे याला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान, त्याने हृषीकेशच्या हत्येची कबुली दिली.
कशी आणि का काली हत्या?
२२ सप्टेंबर २०२५ रोजी बठाण शिवारातील आपल्या शेतात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून हृषीकेशची गळा आवळून हत्या केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन गोलापांगरी येथील पुलावरून दुधना नदीच्या पात्रात फेकून दिला होता. तपासादरम्यान अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी मृतदेहाची नोंद असल्याचे पोलिसांना समजले. तालुका जालना पोलिसांनी मृतदेहाचे हाडे आणि हृषीकेशच्या आईचे रक्ताचे नमुने न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले होते. नुकताच प्राप्त झालेल्या डी.एन.ए. अहवालात मयत तरुण हा हृषीकेश पवारच असल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हा दाखल
वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हृषीकेशचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डी.बी. पथकाच्या फिर्यादीवरून अविनाश वाघमारे याच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ च्या कलम १०३ (१) (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
Ans: डीएनए चाचणीच्या अहवालामुळे.
Ans: स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन दुधना नदीत फेकला.
Ans: खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.






