धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; फेसबुकवरून झालेली ओळखच ठरली कारणीभूत
काय घडलं नेमकं?
विद्यार्थी उत्तर प्रदेश मधील मथुरा भक्ती वेदांता गुरुकुल अँड इंटरनॅशनल स्कुल येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून शाळेच्या वसतिगृहात राहतो.विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, 2021 पासून अभ्यासातील किरकोळ चुकांवरून वडील त्याला मारहाण करत होते. 2024 मध्ये आईचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, वृंदावन येथील गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले.
20 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या सुट्टीत तो भाईंदर पूर्व येथील घरी आला असता, वडिलांनी अभ्यास व जेवणाच्या कारणावरून वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. कधी पोटभर जेवण दिले जात नव्हते, तर कधी जबरदस्तीने जास्त जेवण करण्यास भाग पाडले जात होते. विरोध केल्यास काठीने, ठोसे-लाथांनी मारहाण केली जात असल्याचे त्याने सांगितले.तसेच, रागाच्या भरात गरम इस्त्रीने शरीरावर चटके दिल्याने अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचा आरोप त्याने आहे.
गरम पाण्याने झाले जखमा…
या जखमांच्या उपचारासाठी रुग्णालयात न नेता घरीच मलम लावण्यात येत असल्याचेही मुलाने नमूद केले आहे. त्याला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते आणि वडील बाहेर जातांना दरवाजाला कुलूप लावत होते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा शाळेत सोडल्यानंतर शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्यांने संपूर्ण प्रकार सांगितला. शाळा प्रशासनाने त्याच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर जखमा गिझरच्या गरम पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.
गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा
Ans: भाईंदर पूर्व येथील मुलाच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला.
Ans: वडिलांनी मारहाण, उपाशी ठेवणे व गरम इस्त्रीचे चटके दिल्याचा आरोप केला आहे.
Ans: शाळेत शिक्षकांनी शरीरावरील जखमा पाहून विचारपूस केली असता मुलाने संपूर्ण घटना सांगितली.






