रत्नागिरी: रत्नागिरीतून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरील महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीचे नाव वैभव नरकर असे आहे. तो मूळचा रत्नागिरीचा आहे. नरकर हा स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून भासवत होता. त्याने विवाह संकेतस्थळावरून महिलांना फसवले. एका महिलेसोबत बलात्कार केला आणि अनेकांकडून आर्थिक फसवणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला
कशी केली फसवणूक?
पोल्सीणच्या माहितीनुसार, वैभव नरकर याने सोशल मीडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेशातील फोटो वापरून बनावट फ्रोफाईल तयार केली. चेंबूर येथील ३३ वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने लैंगिक अत्याचा केले आहे. त्यानांतर तिच्याकडून एक स्कूटर,₹२.५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ₹३०,००० रोख उकळले.
याआधी सोलापूरच्या एका महिलेलाही अश्याच प्रकारे फसवले होते. “Jeevansathi.com” वरून त्या महिलेशी ओळख करून घेतली आणि लग्नासाठी घरी येण्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्या नातलगाचा अपघात झाल्याचे सांगून ₹६३,००० मागितले. पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलेला तो आधीच विवाहित असल्याचे समजले.
बेरोजगार युवकांना भासवले
त्याचबरोबर नरकरने स्वतःला मंत्रालयात मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे १००हुन अधिक बेरोजगार युवकांना भासवले. त्यांना पोलीस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. काहींना तर पोलीस गणवेश शिवून घेण्यास सांगितले. अनेक पीडितांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या
भीतीने तक्रार दाखल केली नाही.
जमिनीवर सुटल्यावर पुन्हा फसवणूक
वैभव नरकर याला रत्नागिरी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. जमिनीवर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक सुरु केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो सराईत फसवणूक करणारा’ असून, भावनिक आणि सामाजिक विश्वास संपादन करून लोकांची आर्थिक, मानसिक आणि लैंगिक पातळीवर फसवणूक करतो.
बनावट फ्रोफाइल तयार
आरोपी वैभव नारकर हा पकडले जाऊ नये यासाठी सोशल मीडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेषातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली. याद्वारे लोकांना तो पोलीस असल्याचे भासवत असे आणि त्यांची फसवणूक करता होता.
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांना तब्बल 50 लाखांना गंडा; नोकरीचे बनावट पत्र दिले अन् नंतर…