नांदेड मध्ये उज्जैन ला चाललेल्या गाडीचा अपघात चार जणांचा मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
जिंतूर : शहरापासून ४ किमी अंतरावरील आकोली पुलावर ईरटीका गाडी आदळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे सर्व भाविक उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात होते. (Accident News) शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ बुधवारी (दि.११) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. गंगाखेड येथील काही भाविक उज्जैन येथे दर्शनासाठी एर्टिगा कार (क्रमांक एम एच १४ केएफ २७९०) या गाडीने जात असताना पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलावर आदळे. (Nanded News)
उज्जैनला देवदर्शनाला जात असताना भाविकांचा मृत्यू
सदरील गाडी गंगाखेड येथून देवदर्शनासाठी उज्जैनला जात होते, जिल्हा परिषदचा निकाल लागल्यामुळे सर्वजण जात असल्याची माहिती समोर आली आहे. वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला. यामुळे गंगाखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिंतूर ठाण्यात गुन्हा दाखल यात रोहन संजय राठोड (वय २७ वर्ष राहणार गंगाखेड), कृष्णा गुट्टे (वय २८ वर्षे राहणार गंगाखेड), बालाजी आओबा आवटे (वय २१ वर्ष राहणार गंगाखेड), बालप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय ३० वर्ष राहणार गंगाखेड) या चौघांना ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे दाखल केले.
हे देखील वाचा : बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे (वय २५वर्षे राहणार गंगाखेड) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जितूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलविण्यात आले. चालक अभिजित शिंगाडे रा. धनगर मोहा ता. गंगाखेड हा फरार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार दतराव गुंगाने, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात येथील उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहेत, या प्रकरणी वाहन चालकावर जितूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.
हे देखील वाचा : कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
वाहकाने विसरलेले दीड लाखांचे सोने केले परत
राज्य परिवहन महामंडळाच्या जिंतूर आगारातील वाहक घोगरे यांच्या गाडीत दीड लाखाचे प्रवाशांचे सोने विसरून राहिले असता त्यांनी कसलाही विचार न करता प्रवाशांचा फोन आल्यानंतर ते सुखरूप वाहक रामचंद्र घुले यांच्याकडे परत देऊन त्या प्रवाशांपर्यंत सुपूर्द केले. चालक व वाहक यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. प्रवासादरम्यान वेळोवेळी घाई गडबडीत प्रवासी वर्गाचे मौलवान वस्तू सोने, नाणे विसरून राहतात. अशावेळी राज्य परिवहन एसटी महामंडळातील चालक, वाहक वर्ग आपला प्रामाणिकपणा जपून प्रवाशी वर्गाच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू परत देऊन या कलयुगात आपला आदर्श जपतात. आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण, स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे व वाहतूक निरीक्षक शरद पाटील यांनी वाहक वाहक घोगरे व रामचंद्र घुले यांचे कौतुक केले आहे.






