काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा २४ वर्षीय पती श्रीपेरंबदूर परिसरात सिक्योरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता. मृतक तिघेही हे चेन्नईच्या तारामणी परिसरात आपल्या नातेवाईकांच्या जवळ राहत होता. २५ जानेवारीच्या रात्री बिहारमधील स्थलांतरित
कामगार असल्याचा दावा करणारे काही पुरुष पीडित तरुणासोबत दारू पित होते. यादरम्यान, आरोपींनी पीडित तरुणाच्या पत्नीवर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केले.
त्यानंतर संबंधित तरुणाने आरोपींना विरोध केला असता त्यांनी पीडित तरुणावर लोखंडी रॉडने वार करण्यात सुरुवात केली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर, स्वतःला वाचण्याच्या प्रयत्नात आणि कोणताच साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या 2 वर्षांच्या मुलाची देखील निर्घृण हत्या केली. हि संपूर्ण घटना २५ जानेवारी रोजी घडली.
आरोपींनी केला गुन्हा कबुल
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला चेन्नईच्या पॉश परिसरातील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात सापडला त्यांनतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिसांनी टेक्निकल तपास करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची कठोर चौकशी केली असता आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
आरोपींची दिलेल्या माहितीच्या आधारे, दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह बकिंगहॅम कालव्यातून ताब्यात घेतला. आता वडील आणि मुलाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रोयापेट्टाह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पीडित महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही आहे. आरोपींनी सांगितले की, पोलिसांनी महिलेचा मृतदेह इंदिरा नगर एमआरटीएस स्टेशनजवळील एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आला होता. आता पोलीस त्या महिलेचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्नात आहे. या तिहेरी हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?
Ans: तामिळनाडूतील चेन्नई शहरात.
Ans: महिलेने लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यामुळे.
Ans: तीन आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे.






