काँग्रेसच्या एआय व्हिडिओमध्ये २०२० च्या लडाख संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय न घेतल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
काँग्रेस पक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना धारेवर धरले आहे. चीनी सैन्य घुसखोरी करत असताना सैन्याला योग्य निर्णय दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आणि जे योग्य वाटेल ते करा असे म्हटल्यामुळे सैन्याला पाऊले उचलता आली नाही असा दावा काँग्रेस पार्टीने केला आहे. याबाबत फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये उल्लेख असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. हे पुस्तक देखील राहुल गांधी हे संसदेमध्ये घेऊन आले होते.
“जो उचित समझो, वो करो” pic.twitter.com/Ua1tZ59Ikn — Congress (@INCIndia) February 4, 2026
हे देखील वाचा : हॅलो…गद्दार दोस्त! संसदेच्या आवारात राहुल गांधी अन् रवनीत बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत खात्यावर शेअर केलेल्या ५५-सेकंदांच्या क्लिपमध्ये, भारत-चीन लडाख तणावादरम्यान ३१ ऑगस्ट २०२० रोजी रेचिनला खिंडीत घडलेल्या घटनांचे नाट्यमय चित्रण केले आहे, जे माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. यात, आदेश मागणाऱ्या सैनिकांच्या दृश्यांवर मोदींचे ‘जे योग्य वाटेल, ते करा’ हे वाक्य टाकण्यात आले आहे, आणि वाढत्या धोक्यांदरम्यान जबाबदारी झटकल्याचे चित्र निर्माण केले आहे. भाजपचे टीकाकार या व्हिडिओला अनैतिक डीपफेक प्रचार म्हणतात, जो सशस्त्र दलांचा अपमान करतो, तर काँग्रेस याचा वापर मोदींच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी करत आहे. आत्मचरित्रातील हा उतारा प्रदीर्घ मंजुरीच्या विलंबानंतर फेब्रुवारी २०२६ मधील एका मासिकाच्या लेखात पहिल्यांदा समोर आला होता.
हे देखील वाचा : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद
मात्र कॉंग्रेसच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. राजकीय वादामध्ये देशाच्या सशस्त्र दलाचा आणि जवानांचा अपमान होत असल्याचे नेटकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. काँग्रेस पार्टीने भाजपवर टीका करणे योग्य आहे मात्र राजकारणामध्ये देशाचा अपमान नाही केला पाहिजे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.






