पराभूत उमेदवार म्हणतोय, 'आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा...' (iStock)
हैदराबाद : तेलंगणातील अनेक नगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार जल्लोषात मग्न आहेत, तर पराभूत उमेदवार आपल्या पराभवाची कारणे शोधत आहेत. काही पराभूत उमेदवार आता घरोघरी जाऊन रोकड आणि भेटवस्तू परत मागत आहेत, ज्या त्यांनी मतदानापूर्वी वाटल्या होत्या. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानापूर्वी काही नगरपालिका आणि वॉर्डामध्ये प्रति मत अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत वाटप करण्यात आले होते.
महिला मतदारांना प्रेशर कुकर आणि साड्या देण्यात आल्या. हे सर्व उघडपणे घडले, पण निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने आता तेच उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक मतदारांचे दरवाजे ठोठावत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारात मतदार उमेदवारांना विचारत आहेत की, त्यांना साड्या देण्यास कोणी सांगितले होते? आम्ही मतदान केले नाही याची तुमच्याकडे काय खात्री आहे, असा सवालही ते करत आहेत. तुम्ही पैसे दिलेच का? असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”
दुसरीकडे, इतका खर्च करूनही आपल्याला फक्त ८० मते मिळाली, याचे दुःख ज्योती यांनी व्यक्त केले. त्यांना या भागातून एकही मत मिळाले नाही. आता आपल्याला अशा राजकारणाची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ज्योती यांनी पैसे आणि साड्या गोळा करण्याची घटना सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
बीआरएसचा दणदणीत विजय
अध्यक्षपद मुटु चिंतलापल्ली नगरपालिकेच्या एकूण २४ वॉडांपैकी बीआरएस पक्षाने १४ वॉर्ड जिंकले. नगरपालिकेचे मिळवण्यासाठी त्यांनी बहुमत गाठले आहे. तर काँग्रेस पक्षाला केवळ ९ वॉर्डात विजय मिळाला. भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. बीआरएसने या नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर कब्जा केला आहे.






