फोटो सौजन्य: Pintrest
दररोज चालण्याची सवय तुम्हाला रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक रचनेनुसार परिणाम देतो. पण खरंच चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का, याबाबत तज्ज्ञांनी खुलासा केला आहे. रक्तातील इन्सुलिनचा सततच्या चालण्याच्या सवयीमुळे योग्य वापर होतो. म्हणजेच रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण काही अंशी कमी होतं. जर तुम्हाला ही डायबीटीज असेल आणि तुम्ही जर दिवसातून किमान एक तास चालत असाल तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. रोज 5 ते 6 किमी चालल्य़ाने रक्तातील साखरेत सरासरी 30 ते 60 mg/dL इतकी कमी होते. मात्र वय,वजन आणि आहार या सगळ्यावर अवलंबून असतं.
मधुमेह प्रामुख्याने शरीरातील इन्सुलिनच्या विशिष्ट कमतरतेमुळे किंवा त्याच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे होतो. इन्सुलिन काय करतं तर रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवतं. पण, जेव्हा शरीराला इन्सुलिन योग्य प्रकारे वापरता येत नाही किंवा त्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. अयोग्य आहार, जास्त साखर व तेलकट पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, ताणतणाव आणि आनुवंशिक कारणे ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानली जातात. मग मधुमेह रुग्णांनी नेमकं किती तास चालायला हवं हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवायला पाहिजे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.






