• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Dietary Fiber And Fruits Benefits Nrsr

आहारातील फायबर म्हणजे काय? फ्रूट फायबरचे काय आहेत फायदे ? जाणून घ्या

आहारातील फायबर म्हणजे काय, ते तुमच्या आहारात समाविष्ट असणं का आवश्यक असते, फळे व फळांचा रस प्यायल्याने अधिक फायबर शरीरात जाण्यासाठी कशा प्रकारे मदत होते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आहारतज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे.

  • By साधना
Updated On: Jul 14, 2023 | 05:37 PM
आहारातील फायबर म्हणजे काय? फ्रूट फायबरचे काय आहेत फायदे ? जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संतुलित आहारात फायबर (Fiber) असणं गरजेचं आहे. पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यासाठी ते गरजेचे असते. आपल्या आहारात (Balanced Diet) पुरेशा फायबरची खातरजमा करण्यासाठी फळांचं सेवन करायला हवं. कारण, फळांमध्ये डाएटरी फायबर (Dietary Fiber Benefits) मुबलक प्रमाणात असते. आहारातील फायबर म्हणजे काय, ते तुमच्या आहारात समाविष्ट असणं का आवश्यक असते, फळे व फळांचा रस प्यायल्याने अधिक फायबर शरीरात जाण्यासाठी कशा प्रकारे मदत होते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आहारतज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Healthy Diet)

आहारातील फायबर म्हणजे काय?
आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात. पहिला द्रावणीय आणि दुसरा अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि मलाचे वजन वाढवतात.fruit-platter

आहारात फायबर महत्त्वाचे का असते?
आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे आहेत. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते. आतड्यात कोलेस्टरॉल धरून ठेवून ते रक्तप्रवाहात शोषू देत नाही. परिणामी कोलेस्टरॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरातील कॅलरींचे प्रमाण राखले जाते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर फायबरयुक्त पदार्थ खा.

फळे हा फायबरचा उत्तम स्रोत कसा आहे आणि फळे कशी खावी?
फळांमध्ये आहारातील फायबर मुबलक प्रमाणात असते आणि आहारातून आपल्याला मुबलक फायबर मिळेल, याची खातरजमा फळांमुळे होते. अनेक फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय अशी दोन्ही प्रकारची फायबर असतात. त्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. उदा. सफरचंदांमध्ये द्रावणीय फायबर भरपूर असते तर बेरी प्रकारातील फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय फायबर मुबलक असते. केळ, संत्री, बेरी, आंबे, लिची, जांभूळ, पेरू, अननस, कलिंगड आणि डाळिंबांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

तुमच्या रोजच्या आहारात तुम्ही अनेक प्रकारे फळे समाविष्ट करू शकता. त्यातला एक सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे पूर्ण फळ खाणे. दुसरा मार्ग म्हणजे फळांचा रस पिणे. यामुळे तुम्ही अनेक फळांचे एकाच वेळी सेवन करू शकता. एबीसी ज्युसमध्ये, चाट मसाला घातलेला जांभळाचा रस, मिक्स्ड फ्रुट ज्यूस इत्यादींमध्ये फळांच्या रसांचे छान मिश्रण असते. मुबलक फायबर असलेल्या अल्पोपहारासाठी तुम्ही हे रस तुमच्या स्मूदी किंवा योगर्टमध्येही घालू शकता.

high-protein-fruits

फळे कधी खावी हे वैयक्तिक आवड-निवड आणि वेळापत्रकावर अवलंबून असते. पण सामान्यतः रिकाम्या पोटी किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळात फळे खाल्लेली चांगली असतात. रिकाम्य पोटी फळे खाल्ली तर पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

फ्रुट फायबरचे फायदे
• पचनयंत्रणा उत्तम काम करते आणि सामान्य पचनाला मदत करते.
• वजन कमी करून ते प्रमाणात राखण्यात मदत होते.
• हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित आजार, टाइप 2 प्रकारचा मधुमेह, मेटाबॉलिक सिण्ड्रोम होण्याचा धोका कमी होतो
• रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास आणि रक्तातील शर्करेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते

थोडक्यात आरोग्याच्या हितासाठी डाएटरी फायबर (आहारातील फायबर) महत्त्वाचे असते. फळे रुचकर असतातच, त्याचप्रमाणे फायबरचा उत्तम स्रोत असतात आणि फळांमधून अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा किराणा मालाच्या दुकानात किंवा कॅफेमध्ये जाल तेव्हा तुमची आवडती फळे/फळांचा रस नक्की घ्या.

Web Title: Dietary fiber and fruits benefits nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2023 | 05:32 PM

Topics:  

  • Health Article
  • Health Tips

संबंधित बातम्या

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा
1

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
2

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
3

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
4

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय

व्हिडिओ

पुढे बघा
Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.