चहा हे सर्वच भारतीयांचं अगदी आवडतं पेय. मग हिवाळ असो पावसाळा असो किंवा कडक उन्हाळा. चहा प्रेमी कोणत्याही ऋतूत अगदी आवडीने चहा पितात. आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्याबरोबर एक-दोन कप चहा (Tea) प्यायला आवडतो. अनेकांच्या जणू अंगवळणी पडलेली ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. ‘द हेल्थ साइट’च्या मते, संशोधनात असं आढळून आलं आहे की, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी अशी कॅफिनयुक्त पेय प्यायल्यानं त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या तर निर्माण होतातच आणि चयापचय क्रियाही खराब होतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता, पोटात गॅस, उलट्या यांसारख्या समस्याही होऊ शकतात.
रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक का आहे?
जेव्हा आपण रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा यकृतातून बाहेर पडणारा पित्ताचा रस पचन प्रक्रियेत मदत करत नाही, ज्यामुळे उलट्या, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. वास्तविक, रात्रभर तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात जे चहा पिताना पोटात जातात, जे चांगले बॅक्टेरियांना त्रास देतात, ज्यामुळे चयापचय परिणाम होतो आणि पोटात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.
चहा पिण्याचे तोटे
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं आपली भूक संपते आणि तासन्तास खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे गॅस तयार होण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे पोटात अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो.
सकाळी रिकाम्या पोटी कडक चहा प्यायल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागालाही नुकसान होऊ शकते. असे दीर्घकाळ केले तर अल्सर आणि अॅसिडिटीची समस्या सुरू होते.
रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय लागल्यानं पुढे काही वर्षांनी शरीरातील सांधे दुखू लागतात. त्यामुळं पुढे हाडेही कमकुवत होत जातात.
रात्रभर झोपून असल्यानं आपल्या शरीराला जास्त वेळ पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीरात डीहाइड्रेशन होऊ शकते. अशा परिस्थितीत शरीरात कॅफीन मिसळल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
जास्त चहाचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते आणि यामुळे चिडचिड आणि थकवा येण्याची समस्या सुरू होते.
चहामुळे शरीरातील ऍसिड आणि अल्कधर्मी संतुलनास अडथळा येतो, ज्यामुळे नियमित चयापचय विस्कळीत होतं.
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला तर त्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण नीट होत नाही.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास शरीरात आम्लपित्त तयार होते आणि दातांच्या संपर्कात आल्याने दातांचा इनॅमल खराब होतो. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना होण्याची समस्या देखील होते.