(फोटो सौजन्य: Pinterest)
वर्षभर केस कापू नये
काही परंपरा आणि मान्यता सांगतात की, लग्नानंतर मुलीने वर्षभर आपले केस कापू नये. केसांना स्त्रीचे साैभाग्य मानले जाते. याचबरोबर यांना सकारात्मक उर्जेशीही जोडले जाते. यामुळेच नवविवाहित महिलेला लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात आपल्या केसांची खास काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
तेराव्याला जाणं टाळा
धार्मिक परंपरा आणि मान्यतांनुसार, विवाहित महिलेने वर्षभर कोणत्याही तेराव्याला किंवा मृत्यू भोजनाला उपस्थिती दाखवू नये. याचे कारण म्हणजे, लग्नानंतरचा काळ हा नवदाम्पत्यासाठी वैवाहिक जीवन अधिक दृढ करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचा काळ मानला जातो. अशात शोकाच्या ठिकाणी जाऊन तेथील नकारात्मक उर्जा आणि वातावरण तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात.
कुंकु लावताना काळजी घ्या
हिंदू धर्मानुसार, कुंकु हे महिलेच्या साैभाग्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या नवऱ्याच्या नावाचे कुंकु पत्नी लावत असते. यामुळेच किमान वर्षभर कुंकु लावावा आणि ओला कुंकु कपाळावर लावू नये तर भांगेत लग्नावेळी जे कुंकु तुम्हाला देण्यात आले आहे फक्त त्याचा वापर करा. जेव्हा हे कुंकु संपेल तेव्हा तुम्ही नवीन कुंकवाचा वापर करु शकता.
माहेरुन मिळालेल्या साडीची विशेष काळजी
काही मान्यतांनुसार, लग्नानंतर माहेरुन मिळालेली साडी शुभशकुन आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच वर्षभर ही साडी खराब होणार नाही, जळणार नाही किंवा उसवणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. हे नवविवाहित जोडप्यासाठी शुभशकुन आणि दोन्ही कुटुंबांमधील सकारात्मक संबंधांचे लक्षण मानले जाते. शिवाय, लग्नाच्या वेळी मिळालेल्या साड्याच एक वर्ष वापराव्यात.
पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
नदीजवळ जाण्यापासून वाचा
काही लोकांची अशीही मान्यता आहे की, लग्नाच्या वर्षभरात महिलेने गंगा, गोदावरी किंवा कोणत्याही नदीकिनारी जाणे टाळावे. तथापि, शास्त्रांमध्ये असा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही. असं मानलं जात की, लग्नानंतरचे काही महिले नवरा-बायकोसाठी फार संवदेनशील असतात. नदीकिनारी किंवा स्मशानात नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे नवविवाहित जोडप्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.






