Travelling Benefits: तणाव कमी करायचाय? मग घराबाहेर पडा; फिरण्यामुळे सुधारते मानसिक आरोग्य
तज्ज्ञांच्या मते, भात आणि गव्हाची चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. गव्हाच्या चपातीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. दुसरीकडे पांढरा भात लवकर पचतो आणि शरीराला झटपट ऊर्जा देतो. त्यामुळे एका पदार्थाला पूर्णपणे चांगला किंवा वाईट म्हणणे योग्य ठरत नाही.
आहारतज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेणे. मग त्या कॅलरीज भातातून येत असोत किंवा चपातीमधून. अतिखाणे, कमी शारीरिक हालचाल, अपुरी झोप, तणाव आणि अयोग्य खाण्याच्या सवयी यामुळे शरीरात चरबी साठू लागते. त्यामुळे केवळ भात किंवा चपाती कारणीभूत ठरु शकत नाही.
अनेकजण चपातीसोबत भरपूर तूप, लोणी किंवा तेलकट पदार्थ खातात. यामुळे एकूण कॅलरीचे प्रमाण वाढते. तसेच प्रमाणापेक्षा जास्त चपाती खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: चहा-बिस्किट खायला आवडतं? सवय पडू शकते महागात! आरोग्यावर होतो गंभीर परिणाम






