फोटो सौजन्य-pinterest
कडुलिंबाची पाने आरोग्यवर्धक आहेत. कडुलिंब जरी कडू असले तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप मोठे आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात कडुलिंबाचे कडू पान खावून करावे हे आजच्या पिढीला हायसे नक्कीच वाटेल पण कडुलिंबाचे औषधी गुणधर्म खूपच मोठे आहेत. ज्याची गरज ग्रीष्म ऋतू अधिक महत्त्वाची असते. कडुलिंब आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहेत. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. रक्तातील साखर नियंत्रित करणे, त्वचा रोग (मुरुम, खाज) बरे करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, दात व हिरड्या मजबूत करणे आणि केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच या महिन्यात होणाऱ्या सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील कडुलिंबाच्या पानांचे सेवन शरीराला वाचवते.
नवीन वर्षासोबत बहारदार वसंत घेऊन येतो आणि त्यासोबत ‘कफ’ देखील येतो. नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की, या दिवसात कफाचे त्रास सुरू होतात. सर्दी, खोकला, घसा दुखणे, डोकं जड होणे, दम्याचा त्रास वाढणे, त्वचेचे आजार वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात. हा काळच असतो कफ पाझरण्याचा, आपण फक्त कफ नीट सुटण्यासाठी आणि वाहून जाण्यासाठी मदत करायची असते. शिशिरात साचलेली रुक्षता जेवढी जास्त तेवढा कफ घट्ट चिकटून बसतो, सहज सुटत नाही. अशा वेळी जेष्ठमध, सितोपलादि आणि कंटकारी मदत करतातच, पण त्याच्या जोडीला ताजे श्रीखंड अशा वेळी अमृत प्राशनासारखे आहे.
श्रीखंड स्निग्ध आहे, मधुर आहे, असे ताजे स्निग्ध व मधुर श्रीखंड प्रमाणात खाल्ले असता, शरीरातली उष्णता कमी होते, रुक्षता/कोरडेपणा कमी होऊन घट्ट चिकटलेला कफ अलगद सुटतो, पिकतो आणि सहजतेने बाहेर पडतो. नाक, घसा आणि इतर सायनसेसमध्ये अडकून बसलेल्या कफाने वाढलेली बेचैनी, जडपणा आणि वेदना सगळेच कमी होते, अन्न पचन उत्तम होते आणि आपला वसंत ऋतू उत्साहात जातो.
थोडक्यात काय, कफ साचू द्यायचा नाही. कफ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नाकातून किंवा खोकल्यातून पडणारा कफ येतो, पण कफ ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. कफ फक्त फुफ्फुसात साचत नाही, तो शरीरातल्या प्रत्येक घटकात असतो, त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले की, तो शरीरात सर्वत्र वाढू लागतो. गरजेपेक्षा जास्त वाढलेली गोष्ट त्रासदायकच ठरते. जड, घट्ट आणि मंद असलेला कफ पचनशक्ती मंदावतो, अन्न नीट पचत नाही, न पचलेले अन्न अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळेच या ऋतूत कडुलिंब आणि श्रीखंड खाल्ल्यास शरीराला आवश्यक ते गुणधर्म मिळतात आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या दिवशी गोड (श्रीखंड) आणि कडू (कडुलिंब) पदार्थ खाण्याची परंपरा आहे. जीवनातील गोड-तिखट अनुभव स्वीकारण्याचा हा प्रतीकात्मक संदेश मानला जातो.
Ans: गोड आणि कडू चवींचे संतुलन हे जीवनातील सुख-दुःखांचे प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी समान भावनेने स्वीकारण्याचा संदेश यातून मिळतो.
Ans: नाही, ही परंपरा धार्मिकसोबतच आरोग्यदायीही आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही याचे महत्त्व आहे.






