गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारतात? जाणून घ्या यामागे नेमके काय आहे शास्त्र
हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून गोडाचा नैवेद्य दिला जातो.पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. घरात गुढी उभारल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या रंगाचा वापरून करून रांगोळी काढली जाते. घरात तोरण लावून घराचे दार सजवले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा थंडगार अन् चविष्ट श्रीखंड; नोट करा सोपी रेसिपी
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन केले जाते.गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे म्हणजे उंच बांबूची काठी घेऊन त्यावर रंगीत साडी किंवा रंगीत कापडं लावले जाते. कडुलिंब आणि आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी लावून वरून चांदीचे किंवा तांब्याचे कलश लावले जाते. पाडव्याच्या दिवशी अंगणात गुढी उभारणं हे मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी अंगणात गुढी का उभारला जातो? या मागे नेमके काय कारण आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
यंदाच्या वर्षी गुढी पाडवा 30 मार्चला आहे. पाडव्याच्या आधीपासूनच मोठ्या उत्साहात या सणाची तयारी केली जाते. गुढी उभारण्याची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला करण्यात आली होती. धार्मिक शास्त्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की, शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फिकले. या सैन्यांच्या जोरावर त्यांनी शत्रूंचा पराभव केला. या विजयाचे प्रतिक म्हणजे शालिवाहन शके अशी नवीन वर्षाची सुरुवात असते. आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूमधील वाईट वृत्तीवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा आहे. पूर्वीपासून चालत असलेली प्रथा अजूनही प्रथा पाळली जात आहे.
शहाजी राजे जयंती: छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या शहाजी राज्यांची वाचा प्रेरणादायी गोष्ट
रामायणात सांगण्यात आलेल्या कथेनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामाने वालीचा वघ करुन प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होत. रामाच्या विजयाच प्रतिक म्हणजे विजयाची गुढी उभारण्यात येते. त्यासोबत या तिथीला प्रभू रामाचा 14 वर्षांच्या वनवास संपला होता. म्हणून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.