• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amit Shah Calls Aurangzebs Tomb Samadhi Sushma Andhare Attacks Amit Shah

Sushma Andhare News: औरंगजेबाच्या कबरीचा ‘समाधी’ असा उल्लेख; सुषमा अंधारेंचा अमित शहांवर हल्लाबोल

या विधानातील 'समाधी' या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून शहांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 12, 2025 | 04:17 PM
shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कलंकित नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर जाऊन अभिवादन करताना केलेल्या भाषणातील एका विधानावरून मोठा राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. अमित शाहांनी मुघल बादशहा औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख ‘समाधी’ असा उल्लेख केला. त्यांच्याा या वक्तव्यावरून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करत गृहमंत्र्यांना फैलावर घेतले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “रायगडासारख्या पवित्र भूमीवर उभं राहून औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कबरीला ‘समाधी’ म्हणणं हे केवळ भाषेतील चूक नाही, तर हे शिवप्रेमींच्या आणि स्वराज्याच्या विचारांवर आघात करणारे आहे. समाधी हा शब्द थोर संत, महापुरुष, देशासाठी बलिदान देणाऱ्यांसाठी वापरला जातो, औरंगजेबसारख्या आक्रमकासाठी नव्हे.”

Big Breaking: सुरक्षा दलांनी जंगलाला वेढा घातला अन्…; छत्तीसगडमध्ये २ नक्षलवाद्यांना ठोकण्यात यश

अमित शहांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी त्या संस्कारांवर हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष उभा केला. संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी-संताजी यांनी औरंगजेबाशी शेवटपर्यंत लढा दिला आणि अखेर महाराष्ट्रात त्याचीच ‘समाधी’ बनली. हे शिवचरित्र भारतातील प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे.”

या विधानातील ‘समाधी’ या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून शहांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे. सुषमा अंधारे यांचे मत आहे की, स्वराज्य आणि हिंदवी विचारांवर आघात करणारे असे विधान एका केंद्रीय गृहमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हते. या वादामुळे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्याच्या सन्मानाच्या राजकीय बाजूंवर चर्चा सुरू झाली आहे.

अमित शांहाच्या या विधानानंतर  सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  “अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा. समाधी साधूसंत पुण्यवंताची असते. ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो. छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आले नाहीत!

विमानाने फिरायचा अन् इमारतीवर Spiderman सारखा चढून चोरी करायचा, १२ तासात पोलिसांकडून अटक

काय म्हणाले अमित शाह?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहून महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत शिवचरित्राचा गौरव करत, रायगडाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला.

“मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही, तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे,” असे सांगत शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “आमचे सरकार रायगडाला केवळ पर्यटनस्थळ बनवणार नाही, तर प्रेरणास्थळ बनवेल.”शिवाजी महाराजांची महानता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवण्याचा संदेश देताना शाह म्हणाले, “मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते पाहू नका. देश आणि जग त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई शिवाजी महाराजांनीच लढली होती.”

अमित शहा यांनी रायगडाच्या ऐतिहासिक संघर्षाचाही उल्लेख केला. “रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वराज्य ही शिवाजी महाराजांची संकल्पना होती. त्यांनी २०० वर्षांपासून सुरू असलेली मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्याची खरी प्रेरणा महाराजांकडूनच मिळाली.”भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे सांगताना शहा म्हणाले, “जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० वर्षांचा टप्पा येईल, तेव्हा भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.”

Web Title: Amit shah calls aurangzebs tomb samadhi sushma andhare attacks amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Amit Shah
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
1

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
2

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
3

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
4

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.