मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर फडणवीसांनी केले भाष्य
राज्यपालांच्या अभिभाषणाला दिले मुख्यमंत्र्यांनी उत्तर
CM Devendra Fadnavis: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे यंदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाला आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावले त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीवर भाष्य केले आहे.
अवकाळी पाऊस, कर्जमाफी, भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी ठेवत विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विरोधकांच्या प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तरे दिली आहेत. टिपू सुलतानच्या विषयावर सभागृहात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळाला.
LIVE | राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर 🕜 दु. १.२८ वा. | २६-२-२०२६📍विधान भवन, मुंबई.#Maharashtra #MahaBudget2026 https://t.co/dkado2U28F — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वर्षी आपल्या शेतकऱ्यांवर जे मोठे संकट आले होते. त्यावेळेस आपण बळीराजाला थेट मदत केली होती. आपण हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत थेट पोहोचवले होते. शेतकरी अडचणीत असेल तिथे तिथे सरकार मदतीला उभे असेल.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” कर्जमाफीबाबत आम्ही समिती स्थापन केलेली आहे.आम्ही कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिले आहे ते लवकरच पूर्ण देखील करणार आहोत. सरकार शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबारा याबाबत माहिती असणार आहे.”
“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस 2.0 प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4 हजार 537 रुग्णालयांमध्ये 2 हजार 399 मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे. या टीएमएस 2.0 प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.






