1950 साली जागतिक हवामानशास्त्र संघटना स्थापन झाली. स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवर नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात यावे हवामानाचे महत्त्व समजावे तसेच याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी.या उद्देशाने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन आजच्या युगात ग्लोबल वॉर्मिगचा धोका लक्षात घेऊन विचारमंथन करण्यावर शास्त्रज्ञ भर देत आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेचं विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके हा भविष्यात भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिग चे धोक्याबाबत जनजागृती करीत असतो.
एकाचवेळी सलग न थांबता 100 किलोमीटर अंतर सायकल चालवण्याची अनेकदा सफर पार करणाऱ्या हिरेन राम हिसाळके याने हवामानातील बदल आपल्या दैनंदिन जीवनात कसे महत्वाचे ठरत आहेत.त्या बदलामुळे किती नुकसान समाजाचे होत आहेत हे दाखवण्यासाठी नेरळ गावातील हा 14 वर्षीय विद्यार्थी सायकल वरून शाळा शाळात जाऊन जनजागृती करीत असतो.त्यावेळी भविष्यात या ग्लोबल वॉर्मिग मुळे निर्माण होणारी स्थिती दर्शविण्यासाठी सायकल ची भासणारी गरज आणि त्यावेळी स्वतःचे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते. आणि प्रत्येकाला अंगावर ठराविक पध्दतीचे कपडे परिधान करावे लागू शकतात हे सांगण्यासाठी सायकल वरून जनजागृती करीत असतो.
अशा पध्दतीचं बोलकं चित्र जनतेसमोर मांडण्याचा सायकलवर विविध माहीतीचे फलक, हातात मेगाफोन, तोंडाला ऑक्सिजन मास्क, पाठीवर कृत्रिम पध्दतीचा ऑक्सिजन कॅन, अंगावर कोविड काळात आपण सर्वांचाच लक्ष वेधून घेतलेले.यावेळी हिरेनने पीपीई किट घालून गावातील अनेक शाळांना भेट देत नाक्या नाक्यावर भर उन्हात उभ राहून जनजागृती केली आहे.वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जल,वायू,हवा,कचरा आदी प्रदुषण रोखणे ही काळाची गरज बनली आहे.त्यावेळी शुध्द हवा घेणे तसेच श्वास सुद्धा आपल्याला कृत्रिम पद्धतीचा घ्यावा लागेल.
विद्या विकास मंदिर शाळेतून निघालेली ही सायकल सैर शाळा शाळात जाऊन जनजागृती करण्याचे कार्य हिरेन करीत होता.पुढे नेरळ बाजार पेठ, नेरळ पोलिस ठाणे असा नेरळ साई मंदिर नाका येथून नेरळ विद्या भवन शाळा आणि पुढे सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्र असा प्रवास करीत ही सायकल सैर जनजागृती करीत फिरली.हिरेन यांच्या या वेगळी उपक्रमाला सर्वांची साथ मिळत होती.शालेय विद्यार्थी एकत्र येऊन भविष्यातील ग्लोबल वॉर्मिग चा धोका बद्दल जनजागृती केली आहे.






