मुंबई : नव्याने मुंबईची लाईफलाईन तयार होत आहे. मेट्रो ३च्या (Metro 3 Trial) पहिल्या ट्रेनचं टेस्टिंग यशस्वीरित्या झालं आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मेट्रो ३ च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.
[read_also content=”जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठकचा सन्मान https://www.navarashtra.com/movies/actor-sandeep-pathak-honoured-in-jammu-international-film-festival-nrsr-320744.html”]
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वात आधी या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी उरल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.ज्यावेळी या ४० किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.
कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात खूप वेळा राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.