राज्यात मुसळधार पाऊस होणार (फोटो- ani)
पुणे: राज्य गेले दोन ते तीन दिवस अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात गेले काही दिवस अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि पासची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
कोकण,गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे.काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्याचं घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारताचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापला आहे. मध्य व उत्तर भारतातील काही राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनरपट्टी, मुंबई, ठाण्यात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. राज्यातील कोकण, पुणे, सातारा , रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरला जाण्यासाठी रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पातळ तालुक्यात वाहून गेलेला पूल दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.