इतिहासकार इरफान हबीब यांनी सांगितली ती भयानक गोष्ट (फोटो सौजन्य-X)
Aurangzeb’s Controversy News in Marathi : विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेब आणि त्याची क्रूरता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. दख्खन जिंकण्याच्या प्रयत्नात औरंगजेब आणि मराठ्यांमधील शत्रुत्व छत्रपती शिवाजींच्या काळात सुरू झाले असले तरी, शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर सत्तेवर आलेले छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने एका कटाद्वारे अटक केली. छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला. जेव्हा संभाजी महाराजांनी तसे करण्यास नकार दिला तेव्हा त्यांचे डोळे काढून टाकण्यात आले. त्यांची जीभ देखली कापली. शरीराचा प्रत्येक भाग कापून तुळापूर नदीत फेकण्यात आला. या चित्रपटानंतर औरंगजेबाच्या क्रूरतेवर एक नवीन वाद सुरू झाला आहे. औरंगजेब आपल्या भावंडांशी, वडिलांशी आणि शत्रूंशी कसा वागायचा याबद्दल एका वृत्तवाहीनीला प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी एक मुलाखत दिली.
इतिहासकार इरफान हबीब यांच्या म्हणण्यांनुसार, उपनिषदांना जागतिक स्तरावर मिळालेल्या प्रसिद्धीत औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहचा हात होता. दारा शिकोह यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मांमधील दरी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. दाराने बनारसच्या पंडितांना दिल्लीला बोलावले आणि ५२ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर करण्याचे काम सुरू केले. या भाषांतराचा मुख्य विचार असा होता की मुस्लिमांनाही उपनिषदे वाचता येतील. औरंगजेबाने युद्धात दारा शिकोहचा पराभव केला आणि रक्ताच्या नद्या वाहून सत्ता बळकावली. ३० ऑगस्ट १६५९ रोजी औरंगजेबाने दिल्लीत दारा शिकोहची हत्या केली.
औरंगजेब सत्ता मिळविण्यासाठी काहीही करायला तयार…
दारा शिकोह, शाह शुजा, औरंगजेब आणि मुराद या चार मुलांपैकी शाहजहानला दारा शिकोह सर्वात जास्त आवडायचा. जरी मुघलांमध्ये उत्तराधिकाराची कोणतीही योग्य पद्धत किंवा नियम नाही, म्हणजेच राजा नंतर सिंहासनाचा वारसा कोण घेईल, परंतु औरंगजेबाला वाटले की दारा शिकोह हा शाहजहान नंतरचा राजा असेल. सूडाच्या आगीत, औरंगजेब सत्ता मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार होता. याच कारणामुळे त्याने प्रथम दारा शिकोहला मार्गावरून काढून टाकण्याची योजना आखली. तर दारा शिकोह आपल्या भावावर खूप प्रेम करत होता आणि त्याने एका हत्तीपासून औरंगजेबाचा जीवही वाचवला होता.
मुघल सत्तेच्या लोभापोटी औरंगजेबाने त्याचे वडील शाहजहान यांना तुरुंगात पाठवले. त्यानंतर त्याने युद्धात दारा शिकोहचा पराभव केला. लढाई हरल्यानंतर, दारा युद्धभूमीतून पळून गेला. पण औरंगजेबाने दाराला अटक केली आणि कट रचून त्याचा शिरच्छेद केला. औरंगजेब केवळ दारा शिकोहच्या हत्येने खूश नव्हता. हत्येनंतर त्याने क्रूरतेच्या मर्यादाही ओलांडल्या. भारतीय इतिहासात भावाप्रती अशी क्रूरता कधीच पाहायला मिळत नाही. त्याने दाराचे कापलेले डोके तुरुंगात असलेल्या त्याच्या वडिलांकडे पाठवले, अशी माहिती इतिहासकार इरफान हबीब यांनी दिली.