पर्यटनात Maharashtra देशात 'नंबर १'! परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ; केंद्र सरकारची माहिती (Photo Credit- X)
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १.५१२ दशलक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३.३८८ दशलक्षवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३.७०५ दशलक्ष इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असून, पर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.
Foreign Tourist Arrivals in #Maharashtra More Than Double in Three Years. Rising from 1.512 million in 2022 to 3.388 million in 2023 and further to 3.705 million in 2024. The Ministry regularly holds consultation meetings with the tourism departments of State Governments /… pic.twitter.com/irZkllqsYN — PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 6, 2026
“५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शने, परदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली, रोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ‘स्वदेश दर्शन २.०’ आणि ‘प्रसाद’ (PRASHAD) सारख्या योजनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास आणि आध्यात्मिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नियमितपणे चर्चा आणि समन्वय बैठका घेतल्या जातात, ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे.
“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन






