Maharashtra Breaking News
08 Oct 2025 11:02 AM (IST)
इंदिराबाई हळबे यांनी मावशी हळबे म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. त्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध समाजसेविका होत्या, ज्यांनी १९५४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘मातृमंदिर’ नावाची संस्था स्थापन केली. प्रतिकूल परिस्थितीतही स्वबळावर समाजात कार्य उभ्या करणाऱ्या हळबे मावशींच्या जीवनावर ‘देवरुखच्या सावित्रीबाई’ हे पुस्तक अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिले आहे. अनेक वैयक्तिक धक्क्यांमधून सावरत त्यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. कोकणातील एका गावातून त्यांनी स्वतःच्या आत्मबळावर एक उत्तुंग कार्य उभे केले. आजच्या दिवशी 1998 साली त्यांना देवाज्ञा झाली. पण कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना कोणीही विसरलेले नाही.
08 Oct 2025 11:00 AM (IST)
लातूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला होता. एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना महादेव कोळी समाज आणि बंजारा समाजातील दोन जणांनी आतहमत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कपड्यातून चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी तपास केला आणि भलतच समोर आल. आर्थिक लाभासाठी समाजाला पण वेठीस धरल्याचं समोर आल आहे. तीन वेगवेगळ्या घटना एक निलंगा , दुसरी चाकूर तर तिसरी अहमदपूर तालुक्यात घडली होती. तीन प्रकरणात वेगवेगळ्या आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालं होत. पण काय झाल नक्की वाचा
08 Oct 2025 10:50 AM (IST)
गरेनाने नेहमीप्रमाणे आज देखील त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सची यादी आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे प्लेअर्स लगेचच हे रिडीम कोड्स क्लेम करून त्याच्या मदतीने आकर्षक रिवॉर्ड्स जिंकू शकतात.
08 Oct 2025 10:38 AM (IST)
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि ब्रिटनमधील मैत्री अधिकच घट्ट होताना दिसत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळी मुंबईत पोहोचले. अमेरिकेने टॅरिफवरून तणाव वाढवला असताना, ब्रिटनने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. भारत आणि ब्रिटनमधील अनेक व्यापार करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
08 Oct 2025 10:28 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार आरोपींनी घरात घुसून एका महिलेवर आणि मुलावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडली. या थरारक घटनेने संपूर्ण भागात खळबळ माजली आहे.
08 Oct 2025 10:18 AM (IST)
या आठवड्यात, २ ऑक्टोबर रोजी, दसऱ्याला दोन प्रमुख चित्रपट प्रदर्शित झाले. ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट “कांतारा चॅप्टर १” आणि करण जोहरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटाची कमाई वेगळी आहे. “कांतारा” पहिल्या दिवसापासूनच प्रचंड यशस्वी ठरला आहे, तर वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ अभिनीत “सनी संस्कार की तुलसी कुमारी” ला रिलीजच्या एका आठवड्यातच मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मंदावला आहे. रिलीजच्या सहा दिवसांनंतरही, “सनी संस्कार की तुलसी कुमारी” ने त्याचे अर्धे बजेटही वसूल केलेले नाही.
08 Oct 2025 10:08 AM (IST)
08 Oct 2025 09:58 AM (IST)
हे आहेत आजचे रिडीम कोड्स
08 Oct 2025 09:48 AM (IST)
बदलापूर: बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता. या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
08 Oct 2025 09:38 AM (IST)
पर्यावरणाचे उल्लंघन आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी “बिग बॉस कन्नड सीझन १२” चे घर सील केले आहे. हा स्टुडिओ बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील बिदादी भागात आहे, जिथे अनेक वर्षांपासून या शोचे चित्रीकरण सुरू आहे. सेट सील केल्यानंतर, घरातील सर्व स्पर्धकांना परिसर सोडावा लागला आहे. “बिग बॉस कन्नड १२” मधील सर्व स्पर्धक आता घराबाहेर पडले आहेत. तहसीलदार तेजस्विनी यांनी स्वतः स्पर्धकांना बाहेर काढले. सर्व स्पर्धकांना कारने ईगलटन रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. बिग बॉस कन्नड १२ चे चित्रीकरण ज्या सेटवर होत होते तो सेट पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.
08 Oct 2025 09:28 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२१२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३ अंकांनी कमी होता. मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या वर बंद झाला.
08 Oct 2025 09:18 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्याने आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता परंडा येथे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या एका कैद्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातील दीड महिन्याच्या कालावधीत कैद्याने लोखंडी गजाला जोरदार धडक घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होती. या कैद्यांवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
08 Oct 2025 09:15 AM (IST)
मेट्रो, रिंग रोड, नियोजित पुरंदर विमानतळ आणि विविध मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सदनिका व जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठी गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत झालेल्या दस्त नोंदणीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण पाच लाख ७६ हजार दस्तांची नोंदणी झाली असून, यामधून शासनाला पाच हजार ९८० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, राज्यभरात झालेल्या २२ लाख दस्त नोंदणींमधून एकूण २८ हजार ९५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
08 Oct 2025 09:08 AM (IST)
भारतात 8 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,203 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,186 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,153 रुपये आहे. भारतात 8 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 157.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,57,100 रुपये आहे.
08 Oct 2025 08:55 AM (IST)
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची मंगळवारी रात्री मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात नाराजीचे वातावरण दिसून आले. बैठकीदरम्यान अजित पवार म्हणाले, “काही नेते विशिष्ट जातीविषयी टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते आणि त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भुजबळ यांच्यावर टीका केली.
08 Oct 2025 08:49 AM (IST)
जयपूर-अजमेर हायवेवर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. रात्री सुमारे ११ वाजता एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकला केमिकलने भरलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर भीषण स्फोटांची मालिका सुरू झाली.
धडकेनंतर आग लागून एलपीजी सिलिंडर एकामागून एक स्फोट होऊ लागले. तब्बल दोन तासांपर्यंत सुरू असलेल्या या दुर्घटनेत जवळपास २०० गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. परिसरात दिवाळीतील अॅटमबॉम्बसारखे आवाज घुमत होते, तर आगीचे ज्वाळा दूरवर दिसत होत्या.
08 Oct 2025 08:45 AM (IST)
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत स्थापन झालेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे आणि विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अधिकारक्षेत्रातील क्षेत्रांवर तुकडेबंदीचा कायदा लागू राहणार नाही.
याशिवाय, प्रादेशिक योजनेनुसार निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रांमधील जमिनींसाठीही ही सूट लागू असेल.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहरी आणि नियोजित विकास क्षेत्रांतील जमिनींच्या व्यवहारांवरील निर्बंध शिथिल होऊन बांधकाम व विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
08 Oct 2025 08:43 AM (IST)
राज्यात हवामानात पुन्हा मोठे आणि अनपेक्षित बदल होत असून, अनेक जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मान्सून सध्या राज्यातील काही भागांतून परतत असला, तरी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या नव्या हवामान प्रणालींमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून माघारीच्या काळात राज्यात दुहेरी हवामान परिस्थिती दिसून येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून पूर्णपणे परत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान मान्सून महाराष्ट्रातून बाहेर पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Marathi Breaking news live updates: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात देशातील काही राज्यात पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. नैऋत्य मान्सून दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बहुतेक भागांमधून माघार घेताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.