कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका
दरम्यान, ई-बसच्या वाढलेल्या तिकिर्टाच्या किमतींबद्दल पर्यटक संतापले आहेत, तर स्थानिक लोक बस प्रवासावरील निर्बंधांवर असंतोष व्यक्त करत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि उच्चाधिकार समितीच्या आदेशानंतर, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी बोरिवली स्टेशन आणि कन्हेरी लेण्यांमधील एसी बेस्ट बससेवा १७ जानेवारीपासून पूर्णपणे बंद करण्यात आली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही महसूल मिळवणारी संस्था नाही. पर्यटकांना पार्कमध्ये प्रवेश, पार्किंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात. आता बसभाड्यातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. पर्यावरणासाठीही चांगली असणारी बेस्टची सेवा बंद करण्यामागील खरा हेतू काय आहे, यावर पर्यटक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
स्थानिक रहिवाशांना चालत जावे लागते घरी त्यानंतर, राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कान्हेरी लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठ पाच इं-बस सुरू केल्या. ही सेवा केवळ पर्यटकांसाठी असल्याने, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरी चालत जावे लागते. राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफांपर्यंतच्या मार्गावर ई-बस धावतात, ज्यांचे तिकीट दर प्रति प्रवासी १०० रुपये आहे.
राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दावा केला की मे १९९७ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय उद्यानात बेस्ट बसेस चालविण्यास मनाई होती. तथापि, त्यानंतरही बेस्ट बस सेवा सुरूच राहिली. बोरिवली रेल्वे स्टेशन (पूर्व) आणि कन्हेरी गुंफांदरम्यान एसी बस मार्ग क्रमांक ए-१८८ चालवली जात होती. जानेवारीमध्ये ही सेवा पूर्णपणे बंद सामान्यतः १५ ते २० रुपयांदरम्यान होते. तथापि, राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचे ई-बसचे भाडे आता प्रति व्यक्ती १०० करण्यात आली. बेस्ट बसेसचे तिकीट रुपये आहे. ज्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. भाडेवाढीमुळे पर्यटकांची संख्या कमी होईल, अशी शंका आहे.






