Bhima Koregaon Case प्रकरणी एनआयएकडून तीन जणांची चौकशी; मुंबई प्रेस क्लबच्या माजी सदस्यांना समन्स
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला भीमा-कोरेगाव प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेले आरोपी उपस्थित होते. याशिवाय, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणाऱ्या मुंबई प्रेस क्लबच्या तीन पदाधिकाऱ्यांचे जबाबही एनआयएने नोंदवले आहेत. या बैठकीचे आयोजन तसेच त्यांना मदत केल्याचा आरोप करत मुंबई प्रेस क्लबने गुरबीर सिंह आणि अन्य दोन सदस्यांना सदस्यत्वातून निष्कासित केले होते. या प्रकरणी क्लबच्या एका सदस्याने तक्रार दाखल करत, ही बैठक काही आरोपींना जामीन देताना न्यायालयाने दिलेल्या अटींचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. विशेषतः सहआरोपींना भेटण्यास किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यावर असलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला होता.
“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी
क्लबच्या नियमांनुसार करण्यात आलेल्या चौकशीनंतर संबंधित तिघांनी या बैठकीचे आयोजन किंवा सुलभता निर्माण केल्याचा निष्कर्ष काढत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने या घटनेची दखल घेत बैठकीला उपस्थित असलेल्या चार आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
जामीन रद्द करण्याच्या अर्जात एनआयएने दावा केला आहे की, ही बैठक बंदी घालण्यात आलेल्या भाकप (माओवादी) संघटनेची विचारधारा प्रसारित करण्यासाठी आणि तथाकथित ‘अर्बन नक्षल’ चळवळीच्या पुढील हालचालींवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारच्या कारवाई देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतात, असा युक्तिवाद एनआयएने केला आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून एनआयएने मुंबई प्रेस क्लबच्या निष्कासित तीन सदस्यांची सविस्तर चौकशी केली आहे.
1 जानेवारी 2018 रोजी, पुण्याजवळ भीमा-कोरेगाव लढाईच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. भीमा-कोरेगाव लढाईचा २०० वा वर्धापन दिन ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. शौर्य दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे पाच लाखांहून अधिक लोक जमले होते. भीमा-कोरेगाव विजयस्तंभावरील मुख्य कार्यक्रम शांततेत सुरू असतानाच, आजूबाजूच्या गावांमध्ये हिंसाचार भडकला. काही लोकांनी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाकडे जाणाऱ्या लोकांच्या वाहनांवर हल्ला केला. या हिंसाचारात सानसवाडी येथील राहुल पटांगले यांचा मृत्यू झाला. या हिंसाचाराच्या निषेधार्थ दलित संघटनांनी बंदची हाक दिली, ज्यामुळे मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि सोलापूरसह राज्यभरातील डझनहून अधिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ झाली. पुणे शहरात सुरू झालेला जातीय हिंसाचार मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये पसरला. अनेक ठिकाणी दुकाने आणि कार्यालये जाळण्यात आली.
“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?






