नांदेडमध्ये बारावी बोर्ड परीक्षा केंद्राची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा जिल्ह्यातील १०९ केंद्रांवर आज – सुरळीतपणे पार पडली. एकूण २१ हजार ९३७ परीक्षाथ्यापैकी २१ हजार ५५० विद्यार्थी उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण ९८.२४ टक्के नोंदविण्यात आले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व १०९ केंद्रांवर परीक्षा शांततापूर्ण व कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. कंधार तालुक्यात पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. ते या केंद्रावर पेपर संपेपर्यंत उपस्थित होते.
दहेली तांडा येथील व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद
त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे देखील उपस्थित होते. नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कमवि येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली असता एका विद्यार्थ्यांवर गैरप्रकार प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच किनवट येथील दहेलीतांडा या परीक्षा केंद्राच्या बाहेर काही अज्ञात व्यक्ती आढळून आल्याने त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींविरोधात सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दहेलीताडा परीक्षा केंद्राचे संचालक यांनी दिली. २५ फेब्रुवारी रोजी जीवशास्त्राच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे ६२ अधिकारी हे ६२ केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. शिक्षण विभागाचे ७ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी अशा एकूण ४० व इतर अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत १०९ केंद्रांवर देखरेख ठेवली.
हे देखील वाचा : मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?
धर्माबादमध्ये पाळला जाणार कडकडीत बंद
धर्माबाद शहरातील रामनगर या स्मशानभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून प्रशासन आणि नागरिक आमने-सामने आले आहेत. पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी धर्माबाद बंदची हाक दिल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रामनगर स्मशानभूमी परिसरातील जागेची निवड केल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या मते, शहराला पुरवठा होणारे पाणी गोदावरी नदीतून घेतले जाते आणि शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच ते नागरिकांना वितरित केले जाते. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात पाण्याची टाकी उभारण्यास तांत्रिक अडचण नसून हा निर्णय वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध असल्याचे प्रशासनाचे महणणे आहे. मात्र या निर्णयाला नागरिकांकडून तीव विरोध होत आहे. स्मशानभूमी ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील जागा असल्याने त्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणे योग्य नसल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.
हे देखील वाचा : स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा






