महागाई भत्त्यात वाढ (फोटो सौजन्य - iStock)
महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही घोषणा केली. गुढी पाडवा १९ मार्च रोजी यावर्षी येत आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी जनतेसाठी हा खूपच मोठा सोहळा असतो. हिंदूंचे हे नवीन वर्ष आहे तर ४ मार्च रोजी देशभरात होळी साजरी केली जाईल. मार्चमध्ये ईदचा सण देखील साजरा केला जातो. या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा मोठी मानली जात आहे.
‘या’ महिन्यापासून रोखीने पैसे दिले जाणार
बुधवारी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घोषणा केली की फेब्रुवारीपासून रोखीने पैसे दिले जातील. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीची थकबाकी मार्च २०२६ मध्ये गुढी पाडव्याला दिली जाईल, तर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीची थकबाकी स्वतंत्रपणे दिली जाईल. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५.१६ लाख कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना होईल असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी १२% वाढ
दरम्यान गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे प्रभारी होते. महागाई भत्त्यात १२% वाढ करण्यात आली होती. त्या तुलनेने यावर्षी करण्यात आलेली वाढ ही खूपच कमी आहे. मात्र तरीही राज्य कर्मचाऱ्यांंना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
या वर्षी सरासरी पगारवाढ अपेक्षित: सर्वेक्षण
देशातील विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या वर्षी सरासरी ९.१% पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या वर्षीच्या ८.९% वाढीपेक्षा थोडी जास्त आहे. मंगळवारी एका सर्वेक्षण अहवालात हा अंदाज मांडण्यात आला आहे. “वार्षिक वेतन वाढ आणि व्यवसाय सर्वेक्षण २०२५-२६” असा हवाला देत, जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी एओएनने म्हटले आहे की या वर्षी ९.१% ची अंदाजित पगार वाढ २०२५ मध्ये नोंदवलेल्या ८.९% च्या वास्तविक वाढीपेक्षा थोडी जास्त आहे. एओएनच्या सर्वेक्षणाची ३२ वी आवृत्ती देशभरातील ४५ उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या १,४०० हून अधिक संस्थांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे.
DA Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी भेट! राज्य सरकारने DA-DR मध्ये वाढ






