• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Founder Of Yusuf Meher Ali Center Freedom Fighter Dr Gg Parikh Passes Away

गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि  ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 02, 2025 | 01:02 PM
गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 रायगड/ भारत रांजणकर :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन 1961 मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील 11 राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि  ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.

समाजवादी कसा दिसतो, हे चित्ररुपाने कुणाला सांगायचं झाल्यास, डॉ. जी.जी. पारिख यांचं नाव पहिले आठवतं. पांढरीशुभ्र दाढी, खादीचा कुर्ता, पायजमा, चेहऱ्यावरील मनमिळाऊ भाव आणि बोलण्यातील कमालीची आपुलकी असणारे जी.जी. पारीख खाच-खळग्यांचा, आड-वळणांचा प्रवास असताना, आजही जीजी ‘वृद्ध’ झाले नाहीत. ते वाढत्या वयानुसार आणखी नव्या उमेदीने विचार मांडतात, बोलतात. त्यांच्यातला उत्साह थक्क करणारा आहे.

1940 साली जीजी परीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या 16 वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. 1942 च्या 7 आणि 8ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रीयपणे लढ्यात उतरले.

स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जीजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं साधारण अठरा एकोणीस वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा10 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले.

1947 साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. लोकांसाठी ते कायम लढत राहिले.सहकारी चळवळ असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जी.जीं.चं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार-समारंभ-गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोसो दूर राहिले. आपल्या सत्ताकेंद्रांनाही जीजींची महती कळली नसावी. हे जीजींचं दुर्दैव नव्हे, तर आपले दुर्दैवं आहे.

आज खादीचा प्रचार-प्रसार आपणच सुरु केल्याचा आव आणत काहीजण चरख्यासोबत फोटो काढतात. अशांना आठवण करुन द्यावी वाटते, जी.जींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. ते आजही खादीचे कपडे परिधान करतात. 1970 च्या दशकात तर त्यांनी ‘Make Khadi a fashion’ हा विचार मांडला होता.

30 डिसेंबर 1924 रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्र नगरमध्ये जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली. आणि अगदी काल-परवापर्यंत म्हणजे वयाच्या 101 व्या वर्षी अंथरुणात राहूनही त्यांचं कार्य अविरत सुरु ठेवले आहे. पनवेल जवळील कर्नाळा ग्रामपंचायत मधील तारा आणि बांधनवाडी इथे स्थित असलेली युसुफ मेहरअली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा पाहिल्यानंतर स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉक्टर यांनी उभे केलेले आभाळभर कार्य लक्षात येते. विशेष म्हणजे आपल्या तारुण्यातच जी जी पारीखांनी जे जे रुग्णालयाला आपले देहदान करण्याचे ठरविल्यामुळे आज सायंकाळी 4वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल येथील युसुफ मेहरअली मेमोरियल ट्रस्टच्या शाळेतील मैदानात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांचा देह जे जे रुग्णालयाला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती जी.जी. पारिखांच्या कुटुंबीयांसह युसुफ मेहरअली सेंटरच्या व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.

Web Title: Founder of yusuf meher ali center freedom fighter dr gg parikh passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
1

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
2

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन
3

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
4

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.