ऐन पावसाळ्यात माथेरानचा धबधबा पर्यटकांसाठी बंद; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
पावसाळ्यात माथेरान परिसर हिरवाईने नटतो. दाट धुके, पावसाच्या सरी आणि डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह विविध भागांतून पर्यटक माथेरानला येतात. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
माथेरान येथील शार्लोट लेक तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्या ठिकाणी धबधबा निर्माण होतो. हा धबधबा माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण बनला आहे. माथेरान मध्ये येत असलेले ९० टक्के पर्यटक हे शार्लोट लेक आणि धबधबा येथे भिजण्यासाठी जात असतात. दरम्यान त्या तलावातील पाणी नगरपरिषदेने सोसून दिल्याने माथेरान मधील तुडुंब भरलेला तलाव रिकामा आहे.आणि त्यामुळे धबधबा बंद झाला असून तलावात पाणी नसल्याने पर्यटक प्रचंड हताश झाले आहेत.
Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर
माथेरान शहरात थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांना पावसाळ्यात शार्लोट लेक तलाव पर्यटकांनी भरून गेलेला असतोतलाव पाण्याने भरून वाहिल्यानंतर तेथे धबधबा निर्माण होतो आणि त्या धबधब्यावर पर्यटक वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक आनन्द घेतात.माथेरान मधील सर्वात सुरक्षित असलेल्या या धबधब्यावर येणारे पर्यटक यांची संख्या दररोज हजारांमध्ये असते.मात्र नगरपरिषदेने १० ऑगस्ट रोजी शार्लोट लेक मधील पाणी सोडण्यात आले आणि त्यानंतर धरणात पाण्याचा थेम्ब राहिलेला नाही.त्याचा सार्वधिक मोठा परिणाम धरणाच्या बाजूला तयार झालेला धबधबा बंद पडला आहे.धरणात पाणी नसल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाणारे ठिकाणी निर्माण झालेला धबधबा देखील कोरडा पडला आहे.त्यामुळे त्या ठिकाणी येणारे पर्यटक नाराज होऊन निघून जात असतात.त्याचा सार्वधिक फटका तेथील व्यवसायिक यांना बसला आहे.
शार्लोट लेक येथील पाण्याचा धबधबा बंद झाल्याने माथेरान मधील पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम सुरु झाला आहे. सर्वाधिक सेफ धबधबा म्हणून शार्लोट लेक येथील धबधबा ओळखला जातो आणि त्या ठिकाणी एकही पर्यटक जात नाहीत अशी स्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.शार्लोट लेक येथील धबधबा बंद झाल्याने शेकडो पर्यटक नाराजी व्यक्त करतात.शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम कधी संपणार आणि शहरातील शार्लोट लेक तलाव पाण्याने भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.






