रवी राणा – नवनीत राणा : २०२४ ची लोकसभा निवडणूक आता जवळ येत असल्याणे जिल्ह्यात राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. आज खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, अनेक लोक आता जनसंवाद यात्रा करत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, 33 महिन्यांचं तुमचं सरकार होतं. तेव्हा कुठं तुमची यात्रा होती सत्ता गेली म्हणून तुम्हाला आता जनसंवाद यात्रा आठवते.
तुम्ही लोकांना नौटंकी म्हणतात तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं तुम्हीच सोडा. महिलांचं नाव घेऊन मी उभी राहिली महिलांचा अपमान करण्यासाठी नाही, नांदगाव पेठ मध्ये किती तरुणांना तुम्ही रोजगार दिला. फोन करून लोकांना सांगतात दहीहंडी ला जाऊ नका. मी तुमच्या नेत्या समोर झुकणार नाही.जनतेसमोर झुकेल, लोकसभा निवडणुकीत रवी राणा कडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांची नाव न घेता माजी मंत्री, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
आज माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मी जेलमध्ये होतो. यशोमती ठाकूर जेलरला फोन करून सांगायच्या की रवी राणाला सतरंजी देऊ नये. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकुर यांच नाव होतं. मंत्रिपद मिळाल नाही म्हणून यशोमती ठाकूर भाजपमध्ये गेल्या नाहीत, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केवा आहे. जनसंवाद यात्रा केल्या पेक्षा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जा. जनसंवाद यात्रा ही नौटंकी आहे. रवी राणा किराणा वाटतो. तर तुम्ही साखर तरी वाटा. काही लोकांनी माझ्या गाडीवर हमला केला चाकू काढला. पण जनता माझ्यासोबत आहे. म्हणून रवी राणांच्या केसालाही धक्का लागत नाही, असं रवी राणा म्हणाले.