कोल्हापूर जिल्ह्यात सौर क्रांती! २,७७१ सौर पंपांना मंजुरी; १,१०७ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुरू
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून, वीज भारनियमन आणि डिझेलवरील खर्चापासून मुक्ती मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सौर कृषी पंपांकडे वाढताना दिसत आहे. एकूण आलेल्या अर्जांपैकी सुमारे ८८ टक्क्यांहून अधिक अर्जाना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील योजनेची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय
मंजूर झालेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणावर पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू असून, आधीच हजारहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या योजनेला विशेष प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर ग्रामीण विभाग । आणि ।।, गडहिंग्लज तसेच जयसिंगपूर विभागांत सर्वाधिक अर्ज, मंजुरी आणि प्रत्यक्ष बसवणी झाली आहे. ग्रामीण विभाग ॥ मध्ये ८२० अर्ज दाखल होऊन ७०८ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यापैकी ५६३ पंपांना मान्यता मिळाली असून मोठ्या प्रमाणावर पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात २२५ अर्ज नाकारण्यात आले आहे, संबंधित अर्ज नाकारण्यामागे प्रामुख्याने सातवा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे, भाडेपट्टीव घेतलेली शेती, तसेच शेती क्षेत्र अपात्र ठरणे कारणे पुढे आली आहेत. पात्रतेचे निकष पूर्ण झाल्याने या अर्जाना मंजुरी देता आली नाही, अश माहिती देण्यात आली आहे.
योजनेत पंप बसवण्यासाठी अधिकृत कंपन्यांमधून निवड करणे आवश्यक आहे. मात्र १३७ अर्जदारांनी अद्याप कंपनीची निवड न केल्यामुळे हे अर्ज ‘पेंडिंग’ अवस्थेत आहेत, संबंधित शेतकऱ्यांनी वेळेत कंपनी निवड केल्यास पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन पंप बसवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोळसा वाहतुकीसाठी GPS अनिवार्य; प्रदूषण रोखण्यासाठी ‘चंद्रपूर मॉडेल’; शंभूराज देसाई यांची माहिती
मागेल त्याला सौर कृशी पंप योजनेतून शेतकऱ्यांना बेट, पारदर्शक आणि वेळेत लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, कोल्हापूर जिल्हाात १,१०७ सौर कृषी पंप प्रत्यक्ष शेतात बसवण्यात आले असून ही महत्त्वाची प्रगती आहे. उर्वरित मंजूर पंपांची बसधणीही वेगाने सुरू आहे. शेतक-यांनी कोणत्याही दलालांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रक्रियेतूनच अर्ज करावा.
– विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
शासनाच्या सौर कृषीपंप योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकूण १,१०७ सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. महावितरणच्या कोल्हापूर मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांश अर्ज मंजूर झाले असून, सध्या २,१५० पंपांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्याची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
| तपशील | संख्या / प्रमाण |
| एकूण प्राप्त अर्ज | ३,१४४ |
| मंजूर अर्ज | २,७७१ (८८%) |
| प्रत्यक्ष बसवलेले पंप | १,१०७ |
| अपात्र ठरलेले अर्ज | २२५ |
| प्रलंबित (कंपनी निवड बाकी) | १३७ |
कोल्हापूर मंडळांतर्गत विविध विभागांत सौर पंपांच्या अर्जांची स्थिती समाधानकारक आहे:
गडहिंग्लज: ८२० अर्ज (७७४ मंजूर)
इचलकरंजी: ७०८ अर्ज (७२३ मंजूर – मागील प्रलंबितसह)
कोल्हापूर ग्रामीण १ व २: ७६० अर्ज (६४४ मंजूर)
कोल्हापूर शहरी व जयसिंगपूर: उर्वरित अर्ज.






