अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनानंतर आकारण्यात आलेल्या नवीन घरपट्टीविरोधात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवासी मालमत्तेचा काही भाग भाड्याने दिल्यास प्रत्यक्ष भाडे रकमेवर आधारित कर आकारणी केल्याने घरपट्टीत मोठी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे मध्यमवर्गीय घरमालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत शिवसेनेने ही पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत क्षेत्रफळानुसार रास्त कर आकारणी करण्याची मागणी केली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनानंतर आकारण्यात आलेल्या नवीन घरपट्टीविरोधात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवासी मालमत्तेचा काही भाग भाड्याने दिल्यास प्रत्यक्ष भाडे रकमेवर आधारित कर आकारणी केल्याने घरपट्टीत मोठी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे मध्यमवर्गीय घरमालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत शिवसेनेने ही पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत क्षेत्रफळानुसार रास्त कर आकारणी करण्याची मागणी केली.






