सुमारे ८ ते ९ कि.मी. घाट मार्गाचे सर्व्हेक्षण
चार वर्षांपूर्वी नियोजित घाट मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार मागील काही दिवसांत घाट मार्गाचे सर्व्हेक्षण सुरु असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचे सर्व्हेक्षण अल्मोटस या नाशिक स्थित कंपनीकडे देण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८ ते ९ कि.मी. घाट मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम आहे.
अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत
काजि मार्गे घाट रस्त्याचे काम आपोआप मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरासह गगनबावडा घाटाना महत्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला होता. कालांतराने काजिर्डा गावात मोठा ल.पा. प्रकल्प मंजुर झाला. आणि त्याचे काम देखील सुरु झाले होते. तथापी अनेक मुद्द्यांवरून स्थानिक जनतेतून संघषांची भुमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडला आहे. अद्यापही त्याचे काम सुरु झालेले नाही, तरीही अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत असायचाच.
घाटाच्या बाजूलाच बारमाही वाहणारा धबधवा असून पावसाळ्यात तसेच त्यानंतर देखील पर्यटक काजिर्डा गावी भेट देतात. घाट मार्ग सुरु झाल्यावर पर्यटकांना त्या धबधब्याकडे जाण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. त्या1 धबधब्याला आता मात्र नवनिर्वाचित आ. किरण सामंत यांनी रस्ते व पर्यटनांसाठी लोकेशन 5 करण्यासाठी ५ कोटीचा निधी दिला आहे. तेथील धबधब्या बरोबर काजिर्डा गावी शिवकालीन, 1 पांडव कालीन अन्य ठिकाणे आहेत, ऐतिहासिकमुडा गड, पांडव कालीन खोदकाम केलेला मोठा पाण्याचा तलाव, घाट माथ्यावरील ऊगवाई मंदिर, म्हातारी घोड नांवाची उंच टेकडी, पोकर धोंड नांवाची खोल दरी, वाचबिळ जवळील गुहा, अशी अनेक तेवील बघण्या सारखी ठिकाणे आहेत.
प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार
हे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाकडे सादर केला जाईल, हा घाट मार्ग गावाबाहेरून काढला जाणार आहे. कारण काजिर्डा गावामध्ये होवू घातलेल्या जामदा प्रकल्पामुळे घाट मार्ग बाहेरून घ्यावा लागणार आहे. काजिर्डा घाट मार्गामुळे राजापूर तालुका आणि कोल्हापूर जिल्हा यामधील अंतर आणि वेळ कमी होणार असून प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.






