दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)
Durgadi Fort News In Marathi: ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दूर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मशीद नाही, असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद आहे, यासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती. यासंदर्भातील सुनावणीनंतर कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याबाबत आज सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.
कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे आदेश जारी केले आहेत. 1971 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या मंदिरातील मशिद का मंदिर यावरुन सुनावणी झाली होती. न्यायलयाने या किल्ल्यावार मंदिराच्या अस्तित्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर हिंदू संघटनेचे अधिकारी आणि शिवसेनेच्या अधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावार आरती करून दिन साजरा केला.
अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज दुर्गाडी किल्ला या परिसरात असलेल्या मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जात असे. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर मर्यादित कालावधीसाठी बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे या किंवा ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. या वर्षी जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याबाहेर घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली होती. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. 90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. दर वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.






